residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पाण्यासाठी जानवेकरांची वणवण 

सकाळवृत्तसेवा

अमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत असून, टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. 
अमळनेर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर जानवे हे गाव आहे. धुळे रस्त्यालगत हे गाव असून, गावाची लोकसंख्याही मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत पाण्याचा मुबलक स्रोत नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होते. शासनाकडून टॅंकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो पुरेसा नाही. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. 
भूजल पातळी घटल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचही विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. ग्रामस्थांना दूर अंतरावरून शेतातून पाणी आणावे लागत आहे. ग्रामस्थ बैलगाडी, मोटरसायकल, सायकल व डोक्‍यावर पाणी वाहून पाण्याची व्यवस्था करीत आहेत. विशेषतः: महिलांचे यात खूप हाल होत आहेत. 
 
प्रशासनाने उपाययोजना कराव्यात 
तीव्र पाणीटंचाई असताना विविध उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गावात एक बोअरवेल असून, त्यावर पाणी भरण्यासाठी झुंबड उडत आहे. गावातील हातपंपांचीही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 
 
विहिरींनी तळ गाठल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टॅंकरने होत असलेला पुरवठा कमी पडत आहे. यासाठी टॅंकर वाढवून देण्याची मागणी केली आहे. 
विजय सोनवणे, सरपंच, जानवे, ता. अमळनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT