live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

बांभोरी पुलाच्या दुरुस्तीत पावसाचा खोडा 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महामार्गाची चाळण झाल्याने वाहनधारकांचा जीव धोक्‍यात असताना या मार्गाच्या दुरवस्थेमुळे धोकादायक बनलेल्या बांभोरीजवळील गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीत आता पावसाने खोडा घातला आहे. दोन दिवसांत पुलाच्या दुरुस्तीचे नियोजन असताना शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. पाऊस थांबलाच तर पूल वाहतुकीसाठी बंद न करता रात्री कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. 
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाला जोडणारा दुवा म्हणून जळगाव शहरालगत बांभोरीजवळचा गिरणा नदीवरील पूल मानला जातो. मुंबई, नाशिक आणि गुजरातकडून राज्यात व पुढे विदर्भ, आंध्रप्रदेशाकडे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरुन जाता येते. त्यामुळे प्रचंड वाहतुकीचा हा महामार्ग आहे. 

चौपदरीकरण रखडले 
गेल्या सात-आठ वर्षांपासून या ना त्या कारणाने या महामार्गाचे धुळे- जळगाव व पुढच्या टप्प्यातील चौपदरीकरण रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी फागणे- तरसोद टप्प्याच्या कामाची निविदा मंजूर होऊन कार्यादेश झाले, वर्षभरापूर्वी कामही सुरू झाले. मात्र, ते काही कारणास्तव मध्येच रखडले. आणि गेल्या काही वर्षांत या महामार्गाची पुरती वाट लागली. 

दुरवस्थेने पूल धोकादायक 
या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने शेतीचेच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील उत्पादनांचे नुकसान होत आहे. नवरात्रोत्सवापाठोपाठ दिवाळीही पावसाने धुवून काढली. अगदी नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस थांबायला तयार नाही, त्यामुळे महामार्गच नव्हे तर सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील गिरणेवरील पूल तर अत्यंत धोकादायक बनला आहे. 

दुरुस्ती रखडली 
महामार्गाची दुरवस्था व पुलाची स्थिती बघता या पुलाच्या दुरुस्तीचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले होते. दोन-तीन दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी उघडीपही दिली होती. त्यामुळे शनिवार व रविवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाली. शुक्रवारी रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे शनिवारी होणारे पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्‍यता आहे. 

वाहतूक सुरू राहणार 
दुरुस्तीसाठी हा पूल दिवसभरासाठी बंद राहणार असल्याच्या अफवा पसरल्याने अनेकांनी त्याबाबत "सकाळ'कडे विचारणा केली. मात्र, अगदी अर्धा तासासाठीही पुलावरील वाहतूक बंद करता येणे शक्‍य नाही. त्यामुळे पाऊस थांबला तर पुलाची दुरुस्ती सुरू करण्यात येईल. त्यासाठी चार-पाच दिवस लागणार असून, दररोज रात्री काम करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT