cotton
cotton 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात सी.सी.आय.ची कापूस खरेदी रखडलेलीच- शेतकऱ्यांमध्ये चिंता 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस 
खरेदी रखडत सुरू झाली आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थिती आहे. कापूस घरात पडून असून तो विकण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, पहूर, शेंदूर्णी (ता.जामनेर), जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव येथे खरेदी केंद्र मंजूर आहेत. यातील जळगाव येथील केंद्र वगळता इतर केंद्र सुरू झाले आहेत. 

इतर केंद्रांमध्ये कमी मजूर व अधिकाऱ्यांची रजा आदी कारणांमुळे खरेदी रखडत सुरू आहे. मागील दोन दिवसात खरेदी सुरू झाली आहे. 29 फेब्रुवारीनंतर खानदेशातील बहुसंख्य कापूस खरेदी केंद्र बंद झाले होते. कोरोना, कापूस उताऱ्याच्या अडचणी यामुळे केंद्रधारक (जॉब वर्कर्स) कारखानदार खरेदी केंद्र सुरू करायला तयार नव्हते. लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री यांनी या अडचणींबाबत काही मुद्दे मार्गी लावले. यानंतर ही खरेदी सुरू झाली आहे. तीदेखील रखडत सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाची कापूस खरेदी मागील आठवड्यातच सुरू झाली असून, सुमारे 10 हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी महासंघाने केली आहे. जिल्ह्यात कासोदा (ता.एरंडोल), पारोळा, दळवेल (ता.पारोळा), धरणगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. 

रोज 20 वाहनांमधील कापसाचीच खरेदी 
केंद्रात जेवढी वाहने येतील, त्यातील कापसाची खरेदी करण्याचे शासनाने म्हटले आहे. परंतु जिल्ह्यात सीसीआय व महासंघाच्या केंद्रात रोज फक्त 20 वाहनांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे गर्दी वाढू नये, सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यासाठी कापूस खरेदीबाबत मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT