उत्तर महाराष्ट्र

अभ्यासक्रम बदलाच्या प्रशिक्षणाचे शिक्षकांना वावडे 

राजेश सोनवणे

जळगाव ः शालेय अभ्यासात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयातील अभ्यासक्रमात बदल होत असतो. या बदललेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना चांगले आकलन व्हावे आणि ते समजावे; त्यासाठी शासनस्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम ठरविला जातो. मात्र, या कार्यक्रमात पहिली ते सातवीपर्यंतच्या सरकारी शाळांमधील शिक्षकांचा अधिक सहभाग असला तरी हे प्रशिक्षण कुणी गांभीर्याने घेत नसल्याने अध्यापनाच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. शिवाय, खासगी शाळांमधील शिक्षक हे प्रशिक्षणापासून काहीसे दूर राहत असल्याचे दिसून येते. 
मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार देशभरात लागू केला आहे. यामुळे प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या मान्यताप्राप्त शाळांमधून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयाच्या शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्याचे निश्‍चित केले आहे. शिवाय, बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे देखील नियोजित आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य प्राधिकरण पुणे यांच्यावतीने राज्यस्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जात असते. यानंतर ते विभाग किंवा जिल्हास्तरावर घेवून शेवटी तालुकास्तरावर घेतले जात असल्याचे डाएट प्राचार्य डॉ. मंजूषा क्षिरसागर यांनी सांगितले. 

खासगी शिक्षक प्रशिक्षणापासून दूर 
महाराष्ट्र राज्य प्राधिकारण पुणेतर्फे बदलणाऱ्या अभ्यासक्रमासंदर्भात दरवर्षी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जात असते. परंतु, या प्रशिक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा शासकीय शाळांमधील शिक्षकांना आमंत्रित करण्यात येत असते. राज्यस्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत असते. राज्यस्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी "डाएट'मार्फत जिल्ह्यातून तीन- चार शिक्षकांची निवड केली जात असते. यानंतर डाएटमार्फत जिल्हास्तरावर आणि त्यानंतर तालुकास्तरावर घेतले जाते. परंतु, या प्रशिक्षासाठी खासगी शाळांमधील शिक्षकांचा समावेश क्‍वचित असतो. अभ्यासक्रम बदलातील प्रशिक्षण हे आठवी ते दहावीच्या खासगी शाळा शिक्षकांना अधिक सहभागी करून घेतले जात असते. पण सातवीपर्यंतच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणापासून खासगी शिक्षक दूर राहत असतात. 

तरीही गुणवत्तेत काहीसे मागे 
शासनाकडून प्रशिक्षण आयोजित करून सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षित करून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचे नियोजन असते. प्रशिक्षणाला जाणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या ग्रेड- पे नुसार भत्ता दिला जातो. अर्थात सरकारी शिक्षकांवर प्रशिक्षणासाठी खर्च केला जात असला, तरी खासगी शाळांच्या तुलनेत शासकिय शाळांची गुणवत्ता काहीसी कमी असल्याचे पाहण्यास मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT