residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

वृक्षतोडीने तापमान वाढीचा फटका! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातच नव्हे, तर सर्वत्र होणारी बेसुमार वृक्षतोड आणि वृक्षांच्या जागेवर उभी राहणारी सिमेंटची जंगले, नवीन वसाहती, कॉलन्यांमुळे वर्षागणिक तापमानात वाढच होत आहे. निसर्गसंपदेवर मानवी अतिक्रमण, यामुळे वनक्षेत्रात घट होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वीचे जंगलक्षेत्र आता नाहीसे झाले असून, नव्या वृक्ष लागवडीअभावी अवघे निसर्गचक्र बदलल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच तापमानवाढीचा त्रासही वाढला आहे. 

शहरीकरणाचा विस्तार झपाट्याने होत असताना त्यासाठी वृक्षांच्या मुळांवरच घाव घातले जात आहेत. वृक्ष हे मानवाचे खरे मित्रच आहेत. पण माणूस वृक्षांचा मित्र बनला नाही, तर आपल्या सोयीसाठी वृक्षतोड करू लागला आहे. या वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास सुरवात झाली आणि त्याचे परिणाम आता तापमान वाढीने दिसू लागले आहेत. शिवाय, आधुनिक जीवनशैलीत फ्रिज आणि वातानुकूलित यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु, या दोन्ही वस्तूंच्या वापरातून कार्बन डायऑक्‍साईची निर्मिती होते. त्याचा परिणाम वातावरणाचे तापमान वाढविण्यावर झाला. या सर्व कारणांमुळे एकूणच पृथ्वीचे तापमान वाढू लागले असून, त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. 

खानदेश "हीट'च 
वृक्षतोड वाढल्याने पृथ्वीवरील तापमान वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे. पण राज्यात खानदेशचा परिसर म्हटला म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यासाठी "हीट'च अनुभवास येते. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी तापमानवाढीचा विचार केल्यास मार्च महिन्यापासूनच पारा चाळिशीच्या वर पोचत आहे. यंदाही एप्रिलच्या मध्यंतरातच तापमान 43 अंशांवर पोचले आहे. उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळत आहे. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांनी स्वतः वृक्ष लागवड आणि संगोपनावर लक्ष देण्याची गरज पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

उद्दिष्ट व्हावे साध्य 
राज्य शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत गतवर्षी राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील 80 टक्‍केच वृक्ष जगल्याचा दावा करण्यात येतो. गतवर्षी जिल्ह्यात 20 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असताना 22 लाख 61 हजार वृक्ष लावण्यात आले. पैकी 17 लाख 81 हजार वृक्ष जगविण्यातच यश आले. यामुळे दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करून शंभर टक्‍के वृक्ष जगविल्यास भविष्यात तापमान वाढीला काहीअंशी ब्रेक लागण्याची आशा निर्माण होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT