union budget
union budget 
उत्तर महाराष्ट्र

Union Budget 2020 : उत्पन्न वाढीच्या योजना व्हाव्यात, 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतकरी अधिक उत्पादन काढतो. तरीही त्याचे उत्पन्न वाढत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी योजना अंदाजपत्रकात असाव्यात. भावांतर निधीची तरतूद असावी, शेतकरी कुटुंबांचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश असावा, युवक शेतीकडे वळतील अशा योजना कृषी क्षेत्रात असायला हव्यात, असा अपेक्षा शेतकऱ्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केल्या. 

भावांतर योजना सुरू करा 
एस. बी. पाटील (सुकाणू समिती सदस्य)
ः राज्य सरकारने पाठविलेले किमान आधारभूत किमतीसाठीचे भाव त्या त्या राज्यांसाठी ग्राह्य धरून बाजारात मिळालेला भाव कमी मिळाल्यास तो फरक देणेसाठी भावांतर निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूद व्हावी. पीक विम्यासाठी शेतकरी हप्ता 20 टक्‍के ऐवजी 2 टक्‍के करून केंद्राचा सहभाग 40 टक्‍केवरून 58 टक्‍के करावा. विम्याचा नियम शेतकरी हिताचे केल्यास कर्जमाफी द्यावी लागणार नाही व आत्महत्या कमी होतील. दरवर्षी शेतकऱ्यांना बॅंकेचे कर्ज मिळण्यासाठी लाखो करोडोचे अंदाज देतात प्रत्यक्षात 25 टक्‍के देखील कर्ज वितरण होत नाही. त्यासाठी कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर कार्यवाही व्हावी. पंतप्रधान रोजगार योजनांद्वारे शेतकरी प्रोसेस प्लांटसाठी अर्ज केल्यास त्यासाठीचे अनुदानात वाढ करावी. शेतकरी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करावे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण कर्ज दिले जाते ते फेडणे नोकरी नसल्याने अवघड जाते. त्यासाठी त्यांना फी सवलतीसाठीची तरतूद व्हावी. रासायनिक खतांचे अनुदान देताना खतांच्या विक्री किमतीवरील जे नियंत्रण हटविले होते. ते परत ठेवून विक्री किमती नियंत्रित कराव्या व विद्राव्य खतांचा देखील अनुदानात समावेश करावा. विजेसाठी राज्यांना अनुदान द्यावे. 

उत्पन्न वाढीसाठी योजना व्हावी 
समाधान पाटील (कृषिभूषण शेतकरी
) ः शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी योजना आहे. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी योजना अंदाजपत्रकात हव्यात. शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवून देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना ज्या योजनेत अनुदान मिळते. त्यापेक्षा अधिक रक्कम "जीएसटी'ला द्यावे लागते. यामुळे अनुदान नको मात्र उत्पन्न वाढीसाठी भरीव योजना हव्यात. 

युवक शेतीकडे वळणाऱ्या योजना हव्या 
नरेंद्र पाटील (आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी
) ः शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. प्रक्रिया उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. भारत युवकांचा देश समजला जातो. युवक शेतीकडे वळण्यासाठी विविध योजना तयार केल्या पाहिजे. जेणेकरून युवकांना शेतात पैसा दिसून ते शेतीकडे वळू लागतील. कृषी यांत्रिकी योजनांवर भर दिला गेला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT