jalgaon zp 
उत्तर महाराष्ट्र

घराघरांत पोहचणार नळ कनेक्‍शन अन्‌ बसणार मीटर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी देता यावे; यासाठी केंद्र शासनाकडून जलजीवन योजना राबविली जात आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक गावात अन्‌ प्रत्येक घरात नळ कनेक्‍शन देवून चोवीस तास पाणी दिले जाणार आहे. नळ कनेक्‍शन देतानाच त्याला मीटर बसविले जाणार असून त्यानुसार पाणी बिल आकारणी केली जाणार आहे. 

केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन योजनेतंर्गत जिल्हा परिषदेकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून 20 फेब्रुवारीपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. 

चार वर्षात काम करणार पूर्ण 
ग्रामीण भागातील गाव, पाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे केंद्र शासनाने जलजीवन अभियान हाती घेऊन 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्यासाठी योजना सुरू केली आहे. योजनेसाठी जिल्हाभरातून प्रत्येक गटविकास अधिकारी निहाय गावांचे आराखडे तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आराखडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावरून शासनाकडे 2 मार्चला आराखडा सादर केला जाणार आहे. योजनेसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीमधून अभियान राबविले जाणार आहे. 

प्रत्येक नळाला मीटर 
जलजीवन योजनेत ग्रामीण भागात प्रत्येक नळाला मीटर लावण्याचे देखील काम योजनेतून केले जाणार आहे. उपलब्धतेनुसार प्रत्येक गावात चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणी वापरासाठी मीटर रिडींगनुसार प्रत्येक महिन्याला बिल नागरिकांना भरावे लागणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT