nandurbar 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार शहरातील कोणते रस्ते आहेत बंद आणि कोणते सुरू जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अखेर जिल्हा प्रशासनाने पुन्हा कठोर पाऊल उचलले आहे.रात्री बारा पासून पुन्हा चार दिवस जीवनावश्‍यक वस्तूंसाठी सकाळी चार तासाची शिथिलता वगळता सर्वच प्रतिष्ठाने व व्यवहारा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दुपारी बारानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. दुपारी बारानंतर शहरातील रस्त्यांवर स्मशान शांतता दिसून आली. दरम्यान, शहरातील मुख्य प्रवेशद्वारासह मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटींग करून रस्ते सील करण्यात आले आहेत. 

आवर्जून वाचा - सुरक्षित गावाला बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे बाधा; ३२ जण क्वॉरंटाईन

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या ६८ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज रुग्ण वाढतच आहेत. अनेक रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास 'हायरिक्स' भागातील असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूच्या अधिक प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरीही नागरिकांकडून मात्र दुर्लक्षच केले जात आहे. शहरात सापडलेले रूग्ण हे बाहेरील मोठ्या शहरांमधून आल्याचे आतापर्यंत चा रूग्णांचा ट्रॅव्हेल हिस्ट्रीवरून दिसून आले आहे. प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेचा फायदा घेत अनेकजण मुंबई, पुणे, कल्याण तसेच गुजरातमधील मोठ्या शहरांमध्ये जा - ये करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रिस्क वाढली आहे. प्रशासनानेही नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने हात टेकले होते. मात्र त्यामुळे अधिकच नागरिक बिनधास्त झाले होते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने पुन्हा कठोर धोरण घेऊन १९ जूनपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून शहरात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. अनावश्‍यक वाहने शहरात येऊन गर्दी होऊ नये म्हणून धुळे चौफुलीवरील मुख्य प्रवेशद्वारालाही बॅरिकेटीग करून बंद करण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे जाणता राजा चौक, महेश स्तंभ चौक, सी.बी पेट्रोल पंप परिसर, संत सेना चौक, करण चौफुली, धानोरा रस्त्यावर बॅरिकॅडींग करण्यात आलेले आहे. जेणेकरून वाहनांना प्रवेश करता येणार नाही व गर्दी कमी होण्यास मदत होईल. नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे 

दुपारी स्मशान शांतता 
आज सकाळी अकरापासूनच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हटकत होते. त्यामुळे दुपारी बारापर्यंत पूर्ण शहरात शुकशुकाट पसरला होता. चौकाचौकात पोलिसांचेच अधिराज्य दिसून आले.बारानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT