Tehsildar
Tehsildar 
उत्तर महाराष्ट्र

देशमाने येथील तलाठ्याची तहसीलदारांनी केली दप्तर तपासणी

संतोष विंचू

येवला : देशमाने येथील तलाठयाने मागील दीड वर्षात फार तर साठ ते सत्तर दिवस कार्यालय उघडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे कामे रेंगाळत असल्याने वेळोवेळी झालेल्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तब्बल एक तास शुक्रवारी (ता.१६) दप्तर तपासणी केली. तसेच येथील शेतकऱ्यांची अडचणी ऐकून घेत होणाऱ्या गैरसोयी बाबत पंचनामा करून कारवाई करण्याचे आश्वासन देऊन दुसरा तलाठी देण्याची ग्वाही दिली.

येथील तलाठी थेट नांदगाव येथून प्रवास करून येतात आणि आलेच तर त्यांना कार्यालयात येण्यास दुपारचे बारा वाजतात. इतर वेळेस सतत मोबाईल बंद ठेवणे,ऑनलाईनच्या नावाखाली तहसील कार्यालयात असल्याचे सांगून तेथेही नसणे, सतत आजारी असल्याने रजा टाकणे इत्यादी प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसील कार्यालय तसेच मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वारंवार तक्रारी केल्या होत्या. येथील तलाठी कार्यालयाला सततच्या दरवाजा बंदची घरघर लागली असून येथे येणारे तलाठी आठवड्यात फक्त एक ते दोन दिवस दोन तासासाठी येत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कामे अडकून पडलेली आहेत.
सात बारा, ८ अ,सहा ड,उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला,संजय गांधी निराधार योजना लाभार्थी आदी महत्वाच्या कामांसाठी देखील आठ दिवस वाट बघावी लागत असल्याने शेतकरी,विध्यार्थी, शासकीय योजनेचे लाभार्थी यांची हेळसांड होत आहे.अखेर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप दुघड यांनी नागरिकांची तक्रार प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्याशी संपर्क साधून केली. दराडे यांच्या आदेशावरून तहसीलदार नरेशकुमार बहिरम,मंडळ अधिकारी एम.एम.ढवण,लिपिक शंखपाळ यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सजेला भेट देऊन एक तास तलाठी कार्यालयातील तीनही गावाच्या दप्तराची कसून तपासणी केली. उर्वरित दप्तर तहसील कार्यालयात तपासणीसाठी बोलवून घेण्यात आले आहे.या तपासणी पंचनाम्यावर संदीप दुघड,भीमराज दुघड,साहेबराव शिंदे,बाळासाहेब देवकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या तलाठयाची बदली करून येथे तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गावात नेमलेले शासकीय अधिकारी,कर्मचारी ग्रामस्थाच्या सेवेसाठी असतात. प्रत्येक शासकीय काम त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही. त्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाने बंधकारक केले आहे ते नागरिकाच्या सोयीसाठीच. अर्थात कोणी मुख्यालयी राहत नाहीच पण किमान रोज नेमणुकीच्या ठिकाणी जायला हवे.ग्रामस्थ गैरसोय झाली तरच तक्रारी करतात.”
- संदीप दुघड, माहिती अधिकार कार्यकर्ते,देशमाने  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT