Banana
Banana Banana
उत्तर महाराष्ट्र

जळगावपाठोपाठ आता तरडीचाही बनाना पॅटर्न !

सचिन पाटील

शिरपूर : भाजीपाल्यामुळे देशभरात प्रसिद्धी मिळविणाऱ्या पूर्व भागातील तरडी (ता. शिरपूर) येथील शेतकऱ्यांची केळी थेट युरोपात निर्यात करण्यात आली. जळगावपाठोपाठ केळी निर्यात करून तरडी गावाने शेतकऱ्यांसाठी रूढ केलेल्या बनाना पॅटर्नचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

तरडी येथील जगन्नाथ उत्तमराव पाटील व पद्माकर जगन्नाथ पाटील यांची एकूण २० टन केळी युरोपसाठी रवाना करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून येथील शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. कंदापासून व रोपापासून येणाऱ्या केळी पिकाचे प्रयोग शेतकऱ्यांनी केले. उत्पादनात वाढ झाल्याने दर वर्षी केळीचे क्षेत्रही वाढले. त्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची अघोषित स्पर्धाच सुरू झाली. उत्पादित मालाची गुणवत्ता पारखून घेण्याची सवयही या शेतकऱ्यांनी बाणवली. त्यातून केळीच्या गुणवत्तेची खात्री पटल्याने आपली केळी देशातच नव्हे, तर परदेशातही पोचावी या अपेक्षेने तरुण शेतकरी कामाला लागले. त्यातून पर्यायांचा शोध सुरू झाला. त्यात गेल्या सहा वर्षांपासून या भागातून शेतमाल खरेदी करणारे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी सहकार्याची भूमिका घेतली. या कंपनीच्या तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांमुळे केळीचा दर्जा अधिक सुधारला. यंदा पीक काढणी सुरू झाल्यापासूनच केळी परदेशात पाठविण्याची तयारी सुरू झाली. गुणवत्ता, दर्जा व मागणी लक्षात घेऊन प्रारंभी बापूसाहेब शिवाजी पाटील यांची केळी इराणला पाठविण्यात आली. युरोपातून मागणी झाल्यानंतर मालाची तपासणी करण्यात आली. त्यात चार शेतकऱ्यांच्या केळीची निवड झाली. त्यापैकी जगन्नाथ पाटील व पद्माकर पाटील यांच्या शेतातील वीस टन केळी निर्यातीसाठी रवाना करण्यात आली.

संघटनेतून प्रयत्न

केळी उत्पादन व विक्रीसाठी येथील शेतकऱ्यांनी केळी बागायतदार संघ स्थापन केला आहे. त्यात बापूसाहेब पाटील, पद्माकर पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, डॉ. हेमंत पाटील, कैलास पाटील, हिंमत पाटील, सुनील पाटील, पद्माकर योगराज पाटील आदींचा समावेश आहे.

जैन टिश्यू कल्चरच्या अकरा हजार रोपांची लागवड केली आहे. सह्याद्री कंपनीने बाग निवडीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेत मार्गदर्शन केल्याने उत्तम गुणवत्तेची केळी पिकविणे शक्य झाले. सुरवातीचा माल इराणमध्ये निर्यात झाला आहे. गुणवत्तेप्रमाणे केळीला चांगला दरही मिळाला. बागेतून सुमारे २७० टन उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-पद्माकर पाटील, केळी उत्पादक

बाग निवडण्यापासून सह्याद्री कंपनीच्या गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादन प्रक्रियेला सुरवात होते. तज्ज्ञांमार्फत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यात येते. फ्रूटकेअर केल्यानंतर बड इंजेक्शन, फवारणी, फुले तोडणी, खते व पाणी व्यवस्थापन, फणी तोडणी, स्कर्टिंग बॅग चढविणे व या प्रत्येक टप्प्यावर टॅग बांधणे आदी कामे करून घेतली जातात.

-सचिन तिडके, सह्याद्री कंपनी

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT