teachers
teachers esakal
नाशिक

खावटी’च्या कामापाठोपाठ शिक्षण सेतूचा शिक्षकांवर बोजा

कुणाल संत

नाशिक : कोरोनामुळे (coronavirus) राज्यातील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आदिवासी विभागातर्फे ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविले जाणार आहे. परंतु कोरोनामुळे आदिवासी नागरिकांसाठी राबविल्या जात असलेल्या खावटी अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी यांसह शाळाबाह्य कामे, अशी कामे करत असतानाच आता शिक्षण सेतू अभियानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही शिक्षकांवरच असल्याने दुहेरी बोजामुळे शिक्षक मेटाकुटीस येण्याची शक्यता आहे. (burden-of- shikshak-setu-abiyan-on-teachers-nashik-marathi-news)

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारीही पूर्ण

राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणारा अदिवासी समाजही भरडला गेला आहे. अनेक जणांच्या कामांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे राज्यातील या नागरिकांना शासनाकडून आर्थिक हातभार लागवा म्हणून खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू करत शासनाने लाभार्थी आदिवासींना चार हजारांची मदत करण्याची घोषणा केली. यात दोन हजार रुपये रोख, तर दोन हजार रुपयांचा किराणामाल देण्याच ठरले. यानंतर राज्यात प्रकल्पस्तरावर शासकीय, अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर शिक्षकांनी कोरोनाकाळात सर्वेक्षण करत बारा लाख लाभार्थी ठरविले. महाराष्ट्रदिनी सुमारे दहा लाख लाभार्थींच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे २३१ कोटी रुपये वर्ग करण्यात आले. आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारीही पूर्ण होत आहे.

खावटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ लाभार्थ्यांना देण्याच्या अनुषंगाने करायची कामांची जबाबदारी हीदेखील याच शिक्षकांना करावयाची आहे. हे पूर्ण होत नाही, तोच राज्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व त्याला देण्यात येणाऱ्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविण्याचा निर्णय घेत आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच असून, यात शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पुरविणे, पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना राबविणे, अभियान उत्तमरीत्या राबविण्यासाठी आवश्‍यक माहिती प्रणाली राबविणे आदी कामेही करावी लागणार आहेत.

या अभियानाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्‍यक समितीची नेमणूकसह अनेक कामे सुरू झाली आहेत. त्यात शिक्षकांचा सहभाग असल्याने आता खावटी अनुदान योजनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसह शिक्षण सेतू अभियानाच्या कामामुळे शिक्षकांना दुहेरी बोजा सहन करावा लागणार आहे.

दुहेरी कामाकाजामुळे नक्कीच शिक्षकांच्या ताणतणावात वाढ होणार आहे. कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण, आरोग्याचे साहित्य नसताना शिक्षकांकडून कोरोनासंदर्भात कामे करून घेण्यात आली. तसेच यामुळे कोरोनाची लागण होऊन राज्यातील आश्रमशाळेतील सुमारे शंभराहून अधिक शिक्षकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे करणार हा शिक्षक आहे तो कामगार नसल्याने शाळाबाह्य कामे शिक्षकांकडून करण्यात येऊ नये.

भरत पटेल, अध्यक्ष, स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT