निफाड (जि. नाशिक) : रब्बी हंगामासाठी शनिवारी (ता. ५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३००क्यूसेकने पाणी सोडण्यात आले होते. मात्र गेल्या कित्येक दिवसात कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे हे कालवे ठिकठिकाणी फुटत आहे. कालव्याच्या ७ कि.मी अंतरावर म्हणजेच वस्तीच्या पुढे म्हसोबा मंदिराजवळ असलेला मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्युसेक पाणी वाया गेले असून त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
''105 वर्ष जुना झालेला गोदावरी डावा कालवा काल फुटल्याने हजारो क्यूसेक पाणी वाया गेले, शेतजमिनीची माती वाहून गेल्याने रब्बी पिकाचे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी व वारंवार अश्या घटना घडत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाने दखल घेऊन दुरुस्ती करावी.'' - संजय नागरे, सारोळे थडी ता. निफाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.