Bhujbal 123.jpg 
नाशिक

इतिहास व इतर गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे" - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  महाविकास आघाडीबाबत भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इतिहास आणि इतर गोष्टी बाजूला ठेवून सरकारने काम करायला पाहिजे. त्याची सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारी पक्ष अडचणीत येणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य करायला हवे. सतत काहीतरी बोलणे चांगले लक्षण नाही. त्यासाठी आपणही सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहोत.  

लोणावळा-खंडाळा-महाबळेश्‍वरप्रमाणे इगतपुरीमध्ये "हिल स्टेशन' 

लोणावळा-खंडाळा-महाबळेश्‍वरप्रमाणे इगतपुरीला "हिल स्टेशन' व्हावे यासाठीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी न मिळाल्यास पर्यटन विभागाकडून निधी घेण्यात येईल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. 30) विभागीय आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडले...

ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ व माझ्या कार्यकाळातील तयार झालेले अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत रखडले आहेत. त्यात प्रामुख्याने कलाग्राम, बोटक्‍लब, रिसॉर्ट, टुरिझम हब, वेलनेस हब, ट्रेकिंग युनिट, पर्यटनाची आणि उपयोगी असलेली काही कामे आणि अपूर्ण असलेली कामे आहेत. त्यावर निर्णय होतील. विमानसेवेच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT