CM Eknath Shinde
CM Eknath Shinde esakal
नाशिक

CM Eknath Shinde | आदिवासी भागात रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी भागात अनेक गावे, वस्त्या, वाड्या, रस्ते विकासापासून वंचित आहेत. या भागात बारमाही रस्ते करण्यासाठी राज्य शासनाकडून कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde statement on Time bound program for roads in tribal areas Nashik News)

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायाच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील, तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी (ता. १५) आदिवासी विभागामार्फत आयोजित जनजातीय गौरव दिन व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते. आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, हिरामण खोसकर, मंजुळा गावित, दिलीप बोरसे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान लक्षात घेऊन जनजाती गौरव दिन साजरा केला जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आदिवासी बांधवांनी केवळ आपली संस्कृती जतन केली नाही, तर या जंगलातील निसर्गसंपदाही जतन केली आणि त्याचं संवर्धनदेखील केलेले आहे. आदिवासी भागातील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये न जोडलेली गाव, पाडे-वाड्यावर वस्ती यांना रस्त्याने जोडणारे, तसेच जे रस्ते सहामायी आहेत, ते बारमाही करण्यासाठी राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम तयार करेल.

वनहक्क दाव्यांसाठी विशेष कक्ष : गावित

आदिवासींच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रात आदिवासी समाज जनजाती आयोग स्थापन करावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. वन हक्क दाव्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर विशेष कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी देखील आदिवासींच्या समस्या प्रखरतेने प्रशासनासमोर मांडून त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

स्वतंत्र क्लस्टर हवे : झिरवाळ

आदिवासी बांधवांकडे वस्तू निर्माण करण्याची कला असली तरी त्यांच्याकडे विक्रीकौशल्य नसल्याने त्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळत नसल्याची खंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे आदिवासींचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आदिवासींचे स्वतंत्र क्लस्टर निर्माण करण्याची गरज आहे. आदिवासी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या सकस व सेंद्रिय उत्पादनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांचे स्वतंत्र क्लस्टर राज्य शासनाने निर्माण करावे.

इतिहास समोर आणावा ः डॉ. पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटायझेशनवर भर दिला आहे. याचा उपयोग करून आदिवासी समाजातील सर्व क्रांतिकारकांची माहिती गोळा करून संग्रहित करावी. हा संग्रहित इतिहास समाजाच्या आजच्या पिढीसमोर आदिवासी विभागाने आणावा. आदिवासी जिल्हा, तालुके विकसित करण्यासाठी शासन काम करत आहे. केंद्राच्या विविध योजना आदिवासी हितासाठी आहेत.

...अन् मुख्यमंत्री झाले एकनाथ खडसे

आदिवासींच्या या सांस्कृतिक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरा दाखल झाले. ते व्यासपीठावर नसताना मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची स्तुती करताना त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ खडसे म्हणून केला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आडनावात चुकी झाल्याचे लक्षात येताच नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करत त्यांनी चुकीची दुरुस्ती केली.

राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल अडीच तास उशिराने पोचले. उशिराने पोचलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणात चिमटा घेतला. कार्यक्रमासाठी आदिवासीबांधव बारापासून उपस्थित आहेत. त्यांना आपली मते नको आहे, तर त्यांची मते आपल्याला लागणार आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उशिराने आल्याची जाणीव करून दिली.

झिरवाळ यांनाही टोला

महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदिवासी आमदार घेऊन येत, तक्रारी घेऊन माझ्याकडे येत असे अन् कामे सांगायचे. मात्र, आता माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जा. ते तुमचे कामे करतील, असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी झिरवाळ यांना टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT