Contaminated tap water (File Photo) esakal
नाशिक

Panchavati Contaminated water : अर्ज विनंत्यानंतरही नळाला गटारीचेच पाणी; गणेशवाडीतील नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

Panchavati Contaminated water : पंचवटीतील गणेशवाडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून दूषित पाणी येत आहे. अर्ज विनंत्या, अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतरही नळावाटे गटारीचेच पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

एकीकडे पंचवटीतील अनेक भागात ऐन पावसाळ्यात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना नळालाही गटारमिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. (Contaminated water supply to Ganeshwadi area of ​​Panchvati for past several days nashik news)

गणेशवाडी परिसरातील मुंजोबा चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नळावाटे चक्क गटारीचे पाणी येत असल्याने स्थानिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे वारंवार विनंत्या अर्ज करून तसेच अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतरही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. या भागात पहाटे पाचला व दुपारी साडेचारला पाणीपुरवठा होतो.

नळ सोडल्यावर सुरवातीला किमान वीस ते तीस मिनिटे नळावाटे गटारमिश्रित पाणी येते. त्यानंतर हळूहळू चांगले पाणी येते, याबाबत वारंवार विनंत्या- अर्ज करूनही परिस्थिती सुधारत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्‍नही उपस्थित होत आहेत.

पंचवटीतील अनेक भागात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग जमू लागले आहेत. विशेष म्हणजे ज्या भागात लोकप्रतिनिधींची निवासस्थाने किंवा संपर्क कार्यालये आहेत, अशा ठिकाणी नियमित साफसफाई होते, दुसरीकडे काही वाड्या- वस्त्यांकडे हेतुपुरस्सर काणाडोळा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बुधवारच्या आठवडे बाजारानंतर अनेक भाजीविक्रेते उरलेला माल जागेवरच सोडून जातात, या भाज्या पावसामुळे सडून दुर्गंधी पसरते. नियमित घंटागाडी येऊनही तीळेश्‍वर मंदिरासमोरच्या जागेत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.

निर्माल्य कलशात कचराच अधिक

गोदापात्रात निर्माल्य व अन्य कचरा टाकण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे. नदीपात्रात निर्माल्य टाकू नये, म्हणून मनपा प्रशासनाने गाडे महाराज पुलाच्या मध्यावर निर्माल्य कलश ठेवला आहे.

परंतु हा निर्माल्य कलश ओव्हरफ्लो होऊनही निर्माल्य कलश स्वच्छ होत नाही, त्यामुळे निम्मे निर्माल्य कलशात तर निम्मे रस्त्यावर अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे काहीजण या निर्माल्य कलशालाच कचराकुंडी समजून त्यात कचराही टाकत असल्याने अलीकडे या कलशात निर्माल्य कमी अन् कचराच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT