Traffic jam nashik
Traffic jam nashik esakal
नाशिक

नाशिक शहरातील निम्मे सिग्नल अतिसंवेदनशील यादीत

विक्रांत मते

नाशिक : शहरांमध्ये मेट्रो निओ सर्वेक्षण होत असताना वाहतूक ठप्प होत असलेल्या भागात केलेल्या पाहणीत शहरातील एकूण सिग्नलपैकी जवळपास निम्मे सिग्नल वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशीलता यादीत टाकण्यात आले आहे. वाहतुकीच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी आत्ताच उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची निर्मिती आवश्यक राहणार आहे.

...म्हणून खासगी वाहनांची वाढतेय संख्या

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना वाहतुकीची समस्यादेखील तितक्याच वेगाने वाढत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे ध्वनी, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात प्रतिदिन रस्त्यावर दुचाकी वाहने तीन लाखांच्या आसपास, तर पाऊण लाखांच्या आसपास तीन चाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नाशिकमध्ये टायर बस मेट्रो येणार?

महापालिकेने (NMC) बससेवा सुरू केली असली तरी संपूर्ण शहराला सामावून घेण्याची क्षमता अद्यापही त्या सेवेत नाही. त्यामुळे राज्यातील भाजपच्या सत्ताकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नाशिकमध्ये मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मेट्रो सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यात आले. मेट्रोसाठी ताशी वीस हजार प्रवाशांची आवश्यकता असते, परंतु नाशिकमध्ये ताशी १६ हजार प्रवासी उपलब्ध होत असल्याने मेट्रोच्या निकषांमध्ये बसत नाही. त्यामुळे नाशिकमध्ये टायर बस मेट्रोचा निर्णय घेण्यात आला.

वाहतुकीचे ४३ हॉटस्पॉट

मेट्रोसाठी सर्वेक्षण होत असतानाच वाहतुकीचे हॉटस्पॉट शोधण्यात आले. त्यात ४३ हॉटस्पॉट निदर्शनास आले. वाहतुकीच्या त्या हॉटस्पॉट वर सध्या सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. यातील वीस सिग्नल वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशीलतेच्या यादीत टाकण्यात आले असून या भागात आताच नियोजन न केल्यास वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

उड्डाणपूल भुयारी मार्गांची गरज

वाहतुकीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील ठरणाऱ्या भागात सद्यःस्थितीत सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणात आणली जाते. सिग्नलवर दोन मिनिटांसाठी एका बाजूचा थांबा असतो. त्या दरम्यान जवळपास अर्धा ते एक किलो मीटर वाहनांच्या रांगा लागतात. शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच नियोजनाची आवश्यकता आहे.

या भागात उड्डाणपूल गरजेचा

सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, गडकरी चौक ते मेहेर सिग्नल, उपनगर, फेम सिनेमा या सिग्नलवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्याने उड्डाणपुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. द्वारका, बिटको, तारवाला नगर, नागजी हॉस्पिटल, जुने पोलिस आयुक्तालय, डॉ. आंबेडकर नगर, गंगापूर नाका येथील सिग्नलवर आतापासूनच नियोजन न केल्यास येथील व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT