kadwa.jpg 
नाशिक

मध्य विभागात 'कादवा'चा सर्वाधिक साखर उतारा!...मार्चअखेर हंगाम आटोपणार

संदीप मोगल

नाशिक : (लखमापूर) गेल्या वर्षीचा दुष्काळ अन्‌ यंदा लांबलेला परतीचा पाऊस यामुळे राज्यभर उसाचे उत्पादन घटत साखर उताराही घटला असून, अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर आटोपणार आहे. मध्य विभागात जिल्ह्यातील कादवाचा साखर उतारा सर्वाधिक 11.43 टक्के असून, कादवात दोन लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. 

सर्वच कारखान्यांना गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचण आली

गेल्या वर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यातच गेल्या वर्षी चाराटंचाईमुळे मोठ्या प्रमाणात चाऱ्याला उसाचा वापर झाल्याने यंदा सर्वच कारखान्यां ना ऊसटंचाईचा सामना करावा लागला. तसेच जी उसाची लागवड झालेली होती, तिला उन्हाळ्यात पाणी कमी मिळाले, तर पावसाळ्यात उशिरा पाऊस होऊन तो अती झाल्याने व पाऊस लांबल्याने उसाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याने उसाचे एकरी उत्पादन घटले असल्याने सर्वच कारखान्यांना गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यास अडचण आली आहे. तसेच साखर उताराही घटला आहे. परिणामी, यंदा उसाचे उत्पादन घटल्याने त्याचा फटका कारखान्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही बसणार आहे. 

कादवाचा साखर उतारा सर्वाधिक 11.43 टक्के

मध्य विभागात एकूण 90 साखर कारखाने सुरू आहे. त्यात नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना व खासगी द्वारकाधीश सुरू आहे. यंदा निफाड व नाशिक तालुक्‍यांत या दोन कारखान्यांसोबतच नगर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने उतरल्याने जानेवारीतच येथील ऊस आटोपला आहे. मध्य विभागात कादवाचा साखर उतारा सर्वाधिक 11.43 टक्के असून, त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातील सोमेश्‍वर 11.41 टक्के आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने 79 दिवसांत एक लाख 77 हजार 423 टन उसाचे गाळप होऊन सरासरी 11.43 टक्के साखर उतारा मिळवत दोन लाख 800 क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. मार्चअखेर जवळपास बहुतांशी कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यात कादवाचे 1.77 लाख टन, तर द्वारकाधीशचे 3.15 लाख टन, असे एकूण 4.92 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. 

गेल्या वर्षीचा दुष्काळ व यंदाचा अतिपाऊस यामुळे उसाचे उत्पादन राज्यभर घटले असल्याने सर्वच कारखान्यांचे गाळप कमी होणार आहे. सरकार उसाच्या एफआरपीचे व साखरेचे किमान दर ठरवते. मात्र साखरेचे दर कमी असल्याने कोणत्याच कारखान्याला एफआरपी देणे शक्‍य होत नाही. त्यासाठी सरकार कर्जरूपी मदत करते. त्याऐवजी सरकारने साखरेचे किमान दर एफआरपी दराच्या तुलनेत वाढविणे अत्यावश्‍यक आहे. - श्रीराम शेटे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT