onion import
onion import esakal
नाशिक

Onion Import : बांगलादेशकडून कांद्याची आयात खुली होण्याची भारताला प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा

Onion Import : बांगलादेशमधील स्थानिक कांद्यामुळे १५ मार्चपासून आयात बंद करण्यात आली आहे. आता बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपला असल्याने आयात बंदी उठवण्याची प्रतीक्षा भारताला आहे.

ही बंद उठल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. (India waiting for onion import to open from Bangladesh nashik news)

दुबर्ई मार्गे मोठ्याप्रमाणात भारतीय कांदा पाकिस्तानमध्ये गेल्याने पाकिस्तानमधील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये कांद्याचे ‘बंपर' उत्पादन आले आहे.

सध्यस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानला कांद्यातून डॉलर्स मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच, पाकिस्तान फळे आणि भाजीपाला निर्यातदार, आयातदार आणि व्यापारी असोसिएशनतर्फे कांद्याचे निर्यातमूल्य मूल्य करण्याचे साकडे पाकिस्तान सरकारला घालण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये कांद्याचे निर्यात मूल्य टनाला ३०० डॉलर इतके आहे. ते १६५ डॉलरपर्यंत कमी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. हे एकीकडे असताना भारतीय निर्यातदारांपर्यंत पाकिस्तानमधील हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती पोचली आहे.

पाकिस्तानमधील हवामान विभागाने जून ते जुलैमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये सामान्य पर्जन्यवृष्टीच्या तुलनेत अधिकचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जून, जुलैमध्ये पंजाबच्या दक्षिण भागामध्ये ३० टक्के, सिंध प्रांतच्या वरील पश्‍चिम भागात आणि पूर्वोत्तर बलुचिस्तान आणि सिंध प्रांतच्या दक्षिण भागामध्ये १५ ते २० टक्के अधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ही माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत धडकली आहे. अशातच, सिंध प्रांतामधील मोठ्याप्रमाणात कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात येण्यास सुरवात होते. त्यामुळे अधिकच्या पावसाचा पाकिस्तानमधील कांद्याला बसणार काय? यावर विशेषतः दुबईसह अरब राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या कांद्याच्या निर्यातीचे भवितव्य अवलंबून असेल, असे भारतीय निर्यातदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निर्यातीत बांगलादेशचा ३० टक्के हिस्सा

भारतीय कांद्या निर्यातीत बांगलादेशचा हिस्सा ३० टक्क्यांपर्यंत असतो. पाकिस्तानचा कांदा बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये येण्यासाठी विलंब लागतो आणि बांगलादेशसह श्रीलंकेतील ग्राहकांच्या जिभेवर भारतीय कांद्याची चव रुळली आहे.

त्यामुळे पाकिस्तानकडून या दोन्ही देशांकडून कांदा विकत घेण्यास पसंती मिळत नाही, असा अनुभव भारतीय निर्यातदारांना आहे. बांगलादेशमध्ये पाकिस्तानचा कांदा पोचण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागतो.

कोलकत्ता सीमेवरून एका दिवसात भारतीय कांदा, तर नाशिकचा कांदा तीन दिवसांमध्ये बांगलादेशमध्ये पोचतो. बांगलादेशसाठी दिवसाला भारतातून ५०० ते ७०० टन कांदा पाठवला जातो.

त्यामुळे पाकिस्तानचा कांदा मलेशिया, सिंगापूर, दुबईसह अरब राष्ट्रांमध्ये पोचला, तरीही बांगलादेश भारतीय कांद्याच्या कमी होणाऱ्या मागणीची कसर भरून काढेल.

त्याचवेळी श्रीलंकेतील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी सप्टेंबर उजाडणार असल्याने तोपर्यंत आठवड्याला ७५० ते ९०० टन भारतीय कांदा श्रीलंकेतील ग्राहकांसाठी जाईल, असे भारतीय निर्यातदार सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT