bhajipala.jpg 
नाशिक

लॉकडाउनमध्ये वाढली भाजीपाल्याची आवक...कांदा, बटाटा अन्‌ टोमॅटोत 'एवढी' वाढ!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लॉकडाउनमध्ये देशात भाजीपाला आवक वाढली असून कांद्याची सहापट अन्‌ बटाटा व टोमॅटोची दुप्पटीने वाढ झाली. देशातील दोन हजार 587 पैकी एक हजार 91 कृषी बाजारपेठा लॉकडाउनच्या अगोदर सुरू होत्या. 21 एप्रिलपासून दोन हजार 69 बाजारपेठांचे कामकाज सुरू झाले. तसेच 16 मार्चच्या तुलनेत 21 एप्रिलला कांद्याची सहापट, तर बटाटा आणि टोमॅटोची दुप्पटीने आवक वाढली आहे. 

ठराविक जिल्ह्यांमध्ये बांबूच्या रोपवाटिका तयार 

देशातील 20 राज्यांमध्ये डाळी, तेलबियांची किमान समर्थन मूल्य देऊन खरेदी सुरू आहे. आतापर्यंत नाफेड, एफसीआय यांनी एक लाख 73 हजार 64 टन डाळींची आणि एक लाख 35 हजार 993 टन तेलबियांची खरेदी केली आहे. त्यासाठी एक हजार 447 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचा लाभ एक लाख 83 हजार 989 शेतकऱ्यांना झाला आहे. आगामी पावसाळ्यात राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत राज्यांनी उपक्रम सुरू केले आहेत. त्यात पिथोरागड (उत्तराखंड) जिल्ह्यात बांबूच्या रोपवाटिकेत रोपे तयार करण्यात आली आहेत. या वेळी रोपे तयार करणाऱ्या कामगारांना मास्क, भोजन आदी सुविधा देण्यात आल्यात. साबरकांठा आणि वंसदा (गुजरात) या जिल्ह्यां मध्येही बांबूच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. कामरूप (आसाम) जिल्ह्यातल्या दिमोरियामधील 520 शेतकऱ्यांनी 585 हेक्‍टर क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांनी काम सुरू केले आहे. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लॉकडाउनमध्ये 24 मार्चपासून आजपर्यंत आठ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात आला आहे. लाभार्थींना 17 हजार 876 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. 

पीक काढणीची स्थिती

-गहू :
मध्य प्रदेशात 98 ते 99, राजस्थानात 88 ते 89, 
उत्तर प्रदेशात 75 ते 78, हरियानामध्ये 40 ते 45, 
पंजाबमध्ये 35 ते 40 आणि इतर राज्यांमध्ये 82 ते 84 टक्के
-डाळी : 
जवळपास सर्व राज्यांमध्ये डाळींच्या पिकाची कापणी-काढणी पूर्ण झाल्यात 
- ऊस : 
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये काम 100 टक्के पूर्ण. 
तमिळनाडू, बिहार, हरियाना आणि उत्तराखंडमध्ये 92 ते 98 टक्के, तर उत्तर प्रदेशामध्ये 80 ते 85 टक्के पूर्ण

- बटाटा :
काढणी पूर्ण झाली असून, साठवणप्रक्रिया सुरू
- कांदा :
अल्पभूधारकांनी रब्बी काढणी जवळपास पूर्ण केली. मोठ्या प्रमाणात लागवड करणारे शेतकरी सध्या काढणीच्या कामात गुंतलेत. मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काढणी सुरू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT