MSRTC BUS (Lalpari)
MSRTC BUS (Lalpari)  esakal
नाशिक

लालपरीची सेवा, उत्पनाची चाके रुळावर

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तब्बल सहा महिने आगारात रूसून बसलेली लालपरी आता महामार्गासह खेड्यापाड्याच्या रस्त्यावर धावू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचीही मोठी गैरसोय दूर झाली असून विद्यार्थ्यांना देखील शाळा- महाविद्यालयांना जाणे- येणे सुकर झाले आहे. येवल्यातून नाशिक, औरंगाबाद, पुण्यासह खेड्यापाड्यातील १५८ फेऱ्या रोज धावत असून यातून साडे तीन लाखावर उत्पन्न आगागाराला मिळू लागले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) येवला आगार तसे उत्पन्नाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असते. नगर-धुळे व नाशिक- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या येवला आगारात मध्यवर्ती ठिकाणासह व्यापारी पेठ असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. थेट इंदूर बर्हाणपूर, शेगाव, धुळे, जळगाव, मालेगाव, मनमाड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, मुंबई या सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्या येथे येतात-जातात.

सहा महिन्याच्या काळात पाच कोटीच्या आसपास उत्पन्नाची झळ देखील आगाराला बसली आहे. सुरुवातीला काही चालक-वाहक रुजू झाल्याने येथून सर्वात अगोदर नाशिक मार्गावर बस सुरू झाल्या होत्या, पण आता सर्वच कर्मचारी हजर झाल्याने सर्व काही पुन्हा सुरळीत होऊन ठरलेल्या बस मार्गावर धाऊ लागल्या आहे.

येथील आगारात एकूण २३३ कर्मचारी असून यातील आजपर्यंत चालक, वाहक, यांत्रिकी व प्रशासकीय विभागाचे सर्वजण हजर झाले आहेत. संप काळात बडतर्फ करण्यात आलेले ३५ जण देखील कामावर आले आहेत. येथील आगाराच्या ४० बस धावू लागल्या आहे. दिवसभरात २७ मार्गावर ३५ नियत व १५८ फेऱ्या रोज होत आहेत. या मार्गावर रोज ११ हजार ४६० किमी बस धावून सरासरी ३ लाख ६० हजारांचे उत्पन्न आगाराला मिळत आहे.

सध्या रोज पुण्यासाठी ३, शेगाव, औरंगाबाद, दहावर नाशिकसह सत्यगाव, नांदगाव, पिंपळखुटे, लासलगाव, सुरेगाव, शिर्डी, नगरसूल, रहाडी, खरवंडी, सायगाव, कातरणी, कुसमाडी, वैजापूर, हडप सावरगाव, मनमाड या मार्गावर बस धावत आहेत. कुसुर, कुसमडी, रहाडी या ग्रामीण भागातील मुक्कामी बस देखील सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होऊ लागली आहे.

प्रतिसाद उत्तम,उत्पन्न रुळावर!

मध्यंतरी बस बंद असल्याने प्रवाशांची बसची सवय मोडते की काय असे वाटत होते. बस सुरु झाल्यानंतर सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र हळूहळू सर्व मार्गावरील बस पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहे. सध्या लग्नसराई असल्याने प्रतिसाद चांगला असून पुढे शाळा-महाविद्यालय सुरू होणार असल्याने सर्व काही पूर्ववत होईल असा आशावाद आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी व्यक्त केला. आगाराला दिवसाला सरासरी चार लाख रुपयाचे उत्पन्न मिळत होते. सध्या उत्पन्न साडेतीन लाखापर्यंत पोचले आहे. यात नक्कीच वाढ होईल असा आशावाद प्रशासनाला व कर्मचाऱ्यांना आहे.

"औरंगाबाद, नाशिक, पुण्यासह आजूबाजूच्या सर्व फेऱ्या सुरळीत झाल्या आहेत. सर्व कर्मचारीही सुरळीतपणे काम करू लागले असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरातल्या १५८ फेऱ्यासह पाच मुक्कामी बस सुरु आहेत. शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर अजून उत्पन्न वाढेल."

- प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT