Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : संतवचनांचा सरळ अर्थ घ्यावा! गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर : संतांना वेदांताचे मर्म आपोआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गोष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत. पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर माहीत असते. आपण ग्रंथातले शब्द तेवढेच वाचतो, त्यांचा अर्थ संतांच्या कृपेवाचून कळणे कठीण असते. संतांच्या वचनाचा आपल्या मनाला वाटेल, तसा अर्थ काढू नये. त्याचा सरळ अर्थ घ्यावा.

ग्रंथ वाचताना आपली मते बाजूला ठेवावीत. एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले, तर पहिले दिसत नाही आणि समजतही नाही, त्यामुळे शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा, असे दिंडोरीप्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. २०) सांगितले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. (nashik Gurumauli Annasaheb More statement news)

गुरुमाउली म्हणाले, की सद्ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. बरेचसे लोक चातुर्मासात विविध ग्रंथ ऐकायला जातात ते लोकांनी आपल्याला बरे म्हणावे, वेळ जात नाही किंवा इतर काही काम नाही म्हणून. खरे म्हणजे, सद्ग्रंथ वाचून स्वत: काय करायला पाहिजे ते शोधून, त्यावर विचार करून तसे अनुकरण करणारे लोक फार थोडे असतात.

ग्रंथ वाचून त्याचा अर्थ व्यवस्थित समजणारे लोक त्यापेक्षा जास्त, ‘मोठ्या संतांचा ग्रंथ’ म्हणून वाचणारे त्याहीपेक्षा जास्त आणि ग्रंथ मुळीच न वाचणारे सर्वांत जास्त असतात. संत सत्पुरुषांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. ते देहाला सावलीप्रमाणे मानतात. संत सत्पुरुषांच्या मनावर सुख-दु:खाचा परिणाम होत नाही. (latest marathi news)

संत एकांतात जातात, याचे कारण त्यांना लोकांतात भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळेच असतात. एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT