sakal book publication rajmata jijau esakal
नाशिक

Sakal Book Publication : ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ पुस्तकाचे प्रकाशन

जिजाऊ नाशिकमध्ये शत्रूच्या अटकेत होत्या त्या वेळी स्वराज्य निर्माणचा निर्धार त्यांनी केला अन् नाशिकमध्ये स्वराज्य निर्माणच बीज रोवलं गेलं.

सकाळ वृत्तसेवा

Sakal Book Publication : जिजाऊ नाशिकमध्ये शत्रूच्या अटकेत होत्या त्या वेळी स्वराज्य निर्माणचा निर्धार त्यांनी केला अन् नाशिकमध्ये स्वराज्य निर्माणच बीज रोवलं गेलं. स्वराज्य निर्माणाच्या ध्येयात जिजाऊ आणि शहाजी राजांमध्ये किंचितही अंतर नव्हतं. बखरकारांनी त्याचा ऊहापोह केला.

शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयात जिजाऊंचा अंश आहे.(Rajmata Jijau Architect of Totalitarian Revolution sakal book publication news)

नीती, मूल्य अन् महिलांची प्रतिष्ठा महाराष्ट्राला देणारी जिजाऊ मला भगवद्‍गीतेसारखी वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी मंगळवारी (ता. २६) येथे केले. ‘राजमाता जिजाऊ’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

प्रकाश पवार यांच्या ‘राजमाता जिजाऊ

सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ या पुस्तकाचे मंगळवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

पवार म्हणाले, जिजाऊंनी मूल्यांच्या आधारे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणी केली. मूल्यांसाठी जगणं, मरणं आणि लढणं, हे शिवरायांच्या विचारांत त्यांनी रुजवलं. बंगलोर येथे राजसत्तेचा त्याग करून स्वशासनासाठी त्यांनी संकल्प केला. अनेक आघात त्यांच्यावर झाले; मात्र भावनिक अन् वैचारिक क्षमतेवर त्यांनी निर्णय घेतले.

शहाजी राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्ती कोंढाणा (आताचा सिंहगड) येथे आणून त्यावर शास्त्रानुसार विधी केले. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची जागतिक राजकीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे दिली. इतकंच नव्हे, तर संभाजी राजांच्या पत्नीला देखील त्यांनी शास्त्र, शस्त्र अन् राज्यकारभाराचं ज्ञान दिलं.

महाराष्ट्राच्या भूमीत जे लपलं आहे ते शिवरायांच्या पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं. जिथे गरज तिथेच तलवार उगारण्याचं तत्त्व शिवरायांना दिलं. मात्र जिजाऊंच्या या इतिहासाची मांडणी इतिहासकार, बखरकार यांनी वेगळ्या पद्धतीने मांडत त्याचा ऊहापोह केला. कागद बोलतो, या उक्तीप्रमाणे त्यांनी रचलेल्या इतिहासाने थैमान घातलं आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इतिहास रंगवणं सोपं आहे, मात्र समजावून घेणं अवघड आहे, हे त्यांनी विशेष नमूद केलं.
ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता, त्याप्रमाणे जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मार्ग दाखविला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.

डॉ. रनाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वाचकांच्या अभिव्यक्तीला स्थान देण्याचा सकाळ प्रकाशनाचा प्रयत्न आहे. ‘सकाळ’ प्रकाशनाचा एक दशकाचा प्रवासात विविध विषयांवर प्रकाशित पुस्तकांच्या ३० लाख प्रतींची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT