नाशिक : लातूर जिल्ह्यातून उदगीर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असताना नाशिकच्या विभाजनातून मालेगाव जिल्हानिर्मितीचा विषय चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे शनिवारी (ता.01) महसूलमंत्र्यांकडे याविषयी बैठक होणार आहे.
राज्यात विकासाला पूरक ठरतील अशा स्वरुपात लहान लहान जिल्हे निर्माण करण्याचा जुना विषय पुन्हा चर्चेत आला आहे. लातूरच्या जिल्हा विभाजनाचा विषय चर्चेत आला आहे. लातूर जिल्ह्यातून उदगीर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याबाबत तेथील विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव मागितल्यापासून राज्यातील सगळेच जिल्हा विभाजनाचे प्रस्ताव चर्चेत आले आहेत. साधारण सहा ते सात तालुक्यांचा एक जिल्हा केल्यास कामकाजात गतिमानता येऊन विकासाला सुलभ ठरते, असे जिल्हा विभाजानामागचे सूत्र आहे. त्यामुळे पंधरा तालुक्यांच्या नाशिक व त्यापाठोपाठ नगर अश्या दोन जिल्ह्यांच्या विभाजनाचे प्रस्ताव पुन्हा समोर आले आहेत.
मालेगाव-श्रीरामपूर?
नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तर नगर जिल्ह्यातून श्रीरामपूर असे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण करण्याचे जुने विषय प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे नाशिक विभागीय महसूल कार्यालयातर्फे यापूर्वीच दोन्ही जिल्ह्यांच्या विभाजनातून नवीन जिल्हा निर्मितीचे प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. नवीन जिल्हे निर्माण केल्यास कोणत्या तालुक्यांना जिल्ह्याचा दर्जा द्यायचा हे राजकीयदृष्ट्या कळीचे मुद्दे ठरत आहेत. लोकसभा मतदारसंघाची रचना, त्यातील बलाबल हेही बऱ्याच प्रमाणात प्रभावभूत ठरत असल्याने हे विषय रखडलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.