Education
Education 
उत्तर महाराष्ट्र

विधीच्या दीड हजार जागा राहणार रिक्‍त

सकाळवृत्तसेवा

नाशिक - राज्यात अभियांत्रिकीपाठोपाठ विधी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणार आहेत. पाच वर्षे एल.एल.बी.च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र 113 महाविद्यालयांमध्ये उपलब्ध 9 हजार 480 जागांच्या तुलनेत अर्ज कमी असल्याने यंदा दीड हजारापर्यंत जागा रिक्‍त राहण्याची चिन्हे दिसताहेत.

विद्यापीठांकडून दोन वर्षांपूर्वी विधी अभ्यासक्रमाच्या पाच आणि तीन वर्षे पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्‍चित करून महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत होती. गेल्या वर्षापासून राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी परीक्षा घेऊन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात झालेल्या विलंबामुळे अध्यापन-अध्ययनावर परिणाम झाला होता.

अर्जासाठी वाढवली मुदत
बारावीनंतर पाच वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलैपर्यंतची मुदत होती. सीईटी परीक्षेनंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी 15 हजार 91 विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र 5 जुलैपर्यंत 8 हजार 450 विद्यार्थ्यांनी कॅप राउंडच्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यातील 6 हजार 509 विद्यार्थ्यांनी पहिल्या कॅप राउंडसाठीची प्रक्रिया पूर्ण केली. सीईटी सेलकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या 1 हजार 841 विद्यार्थ्यांची कॅपसाठीची प्रक्रिया अपूर्ण असून, 6 हजार 641 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून आजपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत वाढवण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT