karanjad village.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अस्थी विसर्जन पाण्यात केलेच नाही..तर असा केला वापर

दीपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा करंजाड (ता.बागलाण) या गावाने बंद केली आहे. अस्थी आणि रक्षा विसर्जन नदीत न करता शेतातच फळ देणारे झाड लावून त्याच्या खड्ड्यात केले जात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन फळझाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम देवरे कुटुंबियांनी केले आहे. 

करंजाड गावात एक अनोखा उपक्रम

करंजाडी खो-यातील सटाणा ताहराबाद राज्य महमार्गावर वसलेले करंजाड हे छोटेसे गाव. या गावाची लोकसंख्या पस्तीसशेच्या आसपास आहे. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून शेतीवरच उदरनिर्वाह केला जातोय. बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात शेततळे खोदून शेतीसाठी सुरक्षित जलसाठा तयार केला आणि त्यातून गावाचे नंदनवन झाले आहे. गाव आज शेती, जलसिंचन आणि दुग्धउत्पादन याबाबत तालुक्यात आदर्श गाव बनू पाहत आहे. गावातील तरुणांनी एकत्र येत अनेक वर्षांपासून छत्रपती युवा जागृती प्रतिष्ठानची स्थापना केली. यामार्फत सार्वजनिक वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, हेल्थ क्लब, व्यायामशाळा, गावातील शाळेसाठी डिजिटल क्लासरूम, अत्यावश्यक खेळणी साहित्य, सुशोभित सुंदर गार्डन बनविणे, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा अनेक योजना राबविल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमाने अतिशय प्रभावित होऊन प्रतिष्ठानने महात्मा गांधी जयंतीपासून गावात एक अनोखा उपक्रम सुरू केला. 

अखंड सुरू असलेल्या परंपरेला फाटा

पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी गावातील मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. त्यामध्ये केशर आंबा, फणस यासारखी फळझाडे त्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ लावण्यात यावीत, असे ठरवले. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावलौकिक असलेले सुधाकर देवरे यांचे नुकतेच निधन झाले. गावात अस्थीविसर्जन बंद करण्यासाठी देवरे कुटुंबियांनी पुढाकार घेऊन फळ झाडाच्या मुळात मृत व्यक्तीच्या शेतात अस्थी विसर्जित करून अखंड सुरू असलेल्या परंपरेला फाटा दिला. शेतात लावलेली झाडे आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देणार असल्याची भावना देवरे कुटुंबियांनी व्यक्त केली. परिसरात याबाबत अनेकांनी कौतुक केले आहे. 

प्रतिक्रिया

मृत व्यतीची रक्षा नदीत विसर्जित केली, तर त्यामुळे जलप्रदूषण होते. पण या उपक्रमामुळे शेतात लावलेली झाडे आणि त्यात असलेल्या आपल्या व्यक्तीच्या आठवणी सतत मायेची सावली देतील. अशी प्रथा तालुक्यात राबवली, तर पर्यावरणाला खूप लाभ होईल - केवळ देवरे, करंजाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT