Bollwind
Bollwind 
विदर्भ

बोंडअळीग्रस्तांना 18 कोटीच

सकाळवृत्तसेवा

नागपूर - बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी ६८ कोटीची गरज असताना शासनाने फक्त १८ कोटींचा निधीच दिला. यामुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

यातून मोजक्‍याच शेतकऱ्यांना मदत होणार असल्याने प्रशासनाकडून मदतीसाठी भेदभाव होत असल्याची टीका शेतकऱ्यांकडून होण्याची शक्‍यता आहे. परिणामी मदतीसाठी निकष कसा ठरवावा, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

मागील खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे कापूस व धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हिवाळी अधिवेशनात यावरून प्रचंड गदारोळ झाला. सरकारने कापूस व धानाच्या नुकसानासाठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. २५ दिवसांपासून निधीसंदर्भात आदेश काढून दहा दिवसापूर्वी प्रत्यक्ष रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयास वळती केली. मात्र ही रक्कमही पूर्ण देण्यात आली नाही. नागपूर जिल्ह्याला ६८ कोटी ५७ लाखाची गरज असताना फक्त १८ कोटींचाच निधी दिला आहे.

जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांपैकी फक्त आठ तालुक्‍यांत बोंडअळीमुळे कापूस पिकाचे  नुकसान दर्शविण्यात आले आहे. तर कामठी, मौदा, काटोल, नरखेड आणि कळमेश्‍वर तालुक्‍यांत शून्य नुकसान दर्शविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT