विदर्भ

३८ लाख मनपा तिजोरीत

सकाळवृत्तसेवा

नागपूर - मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला पहिल्याच दिवशी तीनशे जणांनी प्रतिसाद दिला. महापौर व आयुक्तांच्या मालमत्ता जप्तीच्या इशाऱ्यामुळे दहाही झोनमधून महापालिकेच्या तिजोरीत ३८ लाख ३२ हजारांची भर पडली.

महापालिकेचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे. याकरिता नव्वद टक्के दंड माफीची अभय योजना आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात २१ मार्चपर्यंत ही योजना राबविली जाणार आहे. 
पहिल्या टप्प्यातील योजनेत पहिल्याच दिवशी ३०६ जणांनी प्रतिसाद दिला. यात आशीनगर झोनमध्ये सर्वाधिक १०४ थकबाकीदारांचा समावेश असून त्यांनी ११ लाख ७ हजार रुपये तर धंतोली झोनमध्ये केवळ ५ जणांनी १३.०३ लाखांचा कर भरला. मूळ थकीत रकमेत कुठलीही सवलत न देता केवळ दंडाची रक्कम माफ करण्यात येत आहे. दंडाची ९० टक्के रक्कम माफ केल्यानंतर शिल्लक रक्कम नागरिकांनी भरली. लक्ष्मीनगर झोनमध्ये ३८ जणांनी ५.२१ लाख थकीत रकमेचा भरणा केला. 

आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणातील प्रतिसादामुळे अधिकाऱ्यांच्याही आत्मविश्‍वासात वाढ झाली आहे. सवलतीचा दुसरा टप्पा २४ ते ३१ मार्च या दरम्यान राबविला जाणार आहे. 

यात ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. अनिधकृत बांधकाम केलेल्यांना दंडाची रक्कम माफ केली जाणार नाही. महापालिकेने तब्बल २३२ थकबाकीदारांचे प्रथमच हुकूमनामे प्रसिद्ध केले आहेत. दिलेल्या कालावधीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा थेट लिलाव करून विषय बंद केला जाणार आहे. ही प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवली जाईल. यामुळे थकबाकी भरल्याशिवाय नागरिकांना पर्याय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT