शिरपूर (जि.वाशीम) : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले होते. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने हिरावून नेला होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 8 हजार आर्थिक मदत जाहीर केली होती. 4 महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात आली नाही. याबाबत तहसीलदारांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या उडीद, मूग, सोयाबीन, तूर या पिकाचे अतोनात नुकसान केले होते. सोयाबीन पिकाच्या गंज्यामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बळीराजाला बसला होता. शासनाने कृषी विभाग महसूल विभागाच्या वतीने नुकसानीची पाहणी केली होती. शासनाने हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, 4 महिन्यांचा कालावधी उलटूनही शिरपूर भाग 2 च्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत अद्यापही जमा करण्यात आली नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. मदतनिधी वितरणामध्ये महसूल विभागाकडून अक्षम्य टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत येत आहे. शेतकऱ्यांना मदतनिधी देण्यापासून टाळाटाळ करणाऱ्या व शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शिरपूर भाग 2 चे तलाठी सतत गैरहजर असतात फोन बंद असतो याबाबत मंडळ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवा उडवीचे देतात 4 महिन्यांपासून अतिवृष्टीची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तलाठ्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
-शुभम देशमुख, शेतकरी, शिरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.