File photo
File photo 
विदर्भ

कार्यालयासमोर बांधली जातात जनावरे

सकाळ वृत्तसेवा

सालेकसा (गोंदिया) : तालुक्‍यातील कावराबांध येथील मंडळ अधिकारी कार्यालय वाऱ्यावर असून, वर्षभरापासून मंडळ अधिकारी कार्यालयात येत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात-बारासह अन्य प्रमाणपत्रांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारीच नाही. कोणाचा वचक नाही. सतत कार्यालय बंद राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यालयासमोर जनावरे बांधणे सुरू केले आहे. यावरून शासन, प्रशासनाचे आपल्याच अधिनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटले आहे. हे स्पष्ट होते.  

सालेकसा तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागाचे चार मंडळ आहेत. कावराबांध हे गाव मंडळ महसूल विभाग म्हणून नेमले आहे. या कार्यालयातून शेतकऱ्यांना आनलाइन सात-बारा, नकाशा, फेरफार व इतर प्रमाणपत्रे दिली जातात. मंडळ अधिकारी म्हणून एम. बी. रघुवंशी आहेत. मात्र, ते वर्षभरापासून कार्यालयात येत नसल्याचे समजते. अधिकाऱ्यांचे फलकदेखील गायब झाले आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी कोण? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
या महसूल विभागांतर्गत दहा ते बारा तलाठी साझे येतात. जवळपास 20 ते 30 गावांचा यात समावेश आहे. असे असताना मंडळ अधिकारी कार्यालय वाऱ्यावर असल्याने शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांसाठी मानसिक त्रास सहन करावा लागतो. कावराबांध परिसरात पावसाळ्यात अवैध वाळूसाठा जमा करून अधिक भावाने विकला जात आहे. अधिकाऱ्याचा वचक नसल्याचा गैरफायदा वाळूमाफिया घेत आहेत. या परिसरात अवैधरीत्या वीटभट्टीचा व्यवसायदेखील फोफावला आहे. आतापर्यंत एकाही ट्रॅक्‍टर चालक-मालकांवर कारवाई करण्यात आली नाही. यावरून या कार्यालयाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. दरम्यान, कार्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT