bhandara gondia loksabha election voting sakal
विदर्भ

Loksabha Election 2024 : तापमान वाढल्याने घटले मतदान! भंडारा-गोंदिया मतदार संघात शांततेत मतदान

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत २१३३ मतदान केंद्रांत शांततेत मतदान झाले.

सकाळ वृत्तसेवा

भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत २१३३ मतदान केंद्रांत शांततेत मतदान झाले. दिवसभर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाल्याने अंदाजे ६५ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदार संघात आज, सकाळी सात वाजतापासून २१३३ मतदान केंद्रांत मतदान घेण्यात आले. उष्णतेची लाट असल्यामुळे सर्व मतदान केंद्रात पिण्याचे पाणी, शेड आणि आरोग्य सुविधा ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. आज सकाळपासून संथगतीने मतदानाला सुरवात झाली.

दुपारी एक वाजेपर्यंत ३४.५६ टक्के आणि दुपारी तीन वाजतापर्यंत ४५.८८ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजतापर्यंत ५६.८७ टक्के मतदान झाले असून सहा वाजतापर्यंत मतदान करण्यात आले. सायंकाळी काही मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा होत्या. लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडल्याने रात्री सात वाजापर्यंत २०० पेक्षा अधिक मतदार रांगेत आहेत.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले असून, तेथे ५३.२० टक्के मतदान झाले आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात यापूर्वी २०१९ मध्ये ६८.२७ टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावर्षी ६५ टक्केपर्यंत मतदान होण्याचा अंदाज असून, वाढलेल्या तापमानामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT