file photo
file photo 
विदर्भ

विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याने शनिवारी (ता. 27) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. भाऊराव रामाणी चव्हाण (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सोबतच दुसऱ्याची शेतीसुद्धा ते मक्‍त्याने करीत होते.
शुक्रवारी (ता. 26) रात्री भाऊराव हे शेतात जागलीसाठी गेले होते. परंतु, सकाळी ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता शेताला लागून असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. चव्हाण यांच्यावर बॅंकेसह इतरही कर्ज असल्याची माहिती त्यांचा भाऊ दिलीप रामाणी चव्हाण यांनी पोलिसांना दिली.
आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
आकोली (जि. वर्धा) : लगतच्या म्हसाळा येथील तरुण शेतकरी विजय मुकुंद सपकाळ (वय 35) यांनी शनिवारी (ता. 27) पहाटे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सपकाळ काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होते. ते मूळचे नवरगाव येथील असून, त्यांचे शेत व्याघ्र प्रकल्पात गेल्याने ते म्हसाळा येथे वास्तवास आले होते. पुनर्वसनाच्या वेळी मिळालेली रक्‍कम त्यांच्या उपचारावरच खर्च झाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

SCROLL FOR NEXT