Radhamohan-Singh
Radhamohan-Singh 
विदर्भ

'शेतकरी आत्महत्यांचे राजकारणच जास्त' - राधामोहन सिंह

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अधिक प्रसिद्धी दिली जाते, तसेच या घटनांचे राजकारण जास्त होत असल्याचे मत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रसारमाध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. यामुळे या आत्महत्यांचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिले असून, येत्या एक महिन्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असे सिंह यांनी सांगितले. जीएम बियाणे विकसित करण्यात मोन्सॅंटो कंपनीची असलेली एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या एकाधिकारशाहीमुळे गुलाबी बोंड अळीचे संकट आले. या क्षेत्रात इतर कंपन्यांनाही संधी देण्यात येईल, असेही सिंह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT