विदर्भ

स्वच्छ यवतमाळ बनले कचरायुक्त शहर! कोरोनात आरोग्याशी खेळ

रवींद्र शिंदे

कोरोना संकटातही आतापर्यंत एवढा कचरा का व कोणामुळे साचला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणे व संपूर्ण यवतमाळ शहराला अक्षरक्ष: कचरायुक्त बनण्याची परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

यवतमाळ : शहरातील नागरिकांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून विकासाच्या निमित्ताने रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांचा त्रास आजही सहन करावा लागत आहे. त्यातच सहा महिन्यांपासून कचरा (Garbage) संकलन बंद असल्याने घराघरांत व शहरासह लगतच्या चारही बाजूंनी कचराच कचरा साचला आहे. हा कचरा उचलण्यास आता दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना (Corona) संकटातही आतापर्यंत एवढा कचरा का व कोणामुळे साचला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणे व संपूर्ण यवतमाळ शहराला अक्षरक्ष: कचरायुक्त बनण्याची परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (garbage is being accumulated in yavatmal)

प्रत्येकाने आपले मन व शरिरासोबतच आपले गावही स्वच्छ ठेवले पाहिजे, असा संदेश देणार्‍या राष्ट्रसंतांची जन्मभूमी ही विदर्भातील. या महापुरुषांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या यवतमाळ नगरपालिकेने जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरदेखील आपले नाव उंचावले आहे. मात्र, याच यवतमाळ शहरात गेल्या काही वर्षांपासून जीवघेणी अस्वच्छता निर्माण होणे, हे खूपच दुर्दैवी बाब आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी आपल्या यवतमाळ जिल्ह्याला दोन वेळा मिळाली आहे. आतापर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळलेल्या, राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले प्रभावी नेते, माजी पालकमंत्री, आजी-माजी आमदार व खासदार अशी महत्त्वाची व्यक्ती आपल्या यवतमाळ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी स्वच्छ व सुंदर यवतमाळ शहर म्हणून गौरव प्राप्त केलेल्या आपल्या शहरातच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा व त्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता व येणार्‍या दुर्गंधीबाबत यवतमाळात राहणारे लोकप्रतिनिधी व प्रभावी नेतेही चांगलेच परिचित आहेत. परंतु, तरीदेखील आपल्याच शहरात तोही जीवघेणा कोरोनाच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा का व कसा काय साचू दिला, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्रात व राज्यासह स्थानिक नगरपालिकेतील सत्तेत सहभागी असलेल्या सर्वच राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व नेते यवतमाळ शहरातील परिस्थिती अगदी जवळून प्रत्यक्ष पाहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला शहरातील विकासाचा असमतोल, सर्वत्र निर्माण झालेली अस्वच्छता, ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते, खड्डे, पाण्याचा मूबलकसाठा असूनही सदोष शासकीय यंत्रणेमुळे नागरिकांना भेडसावणारी कृत्रिम पाणीटंचाई, अमृत योजनेचे रखडत चाललेले काम, अपूर्णावस्थेतील नाट्यगृह यांसह असे अनेक विषय (जे थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत) आजही तसेच आहेत. थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला अस्वच्छतादेखील त्यापैकी एक महत्त्वाचा विषय आहे. अतिशय सहनशील असलेल्या व कर भरणार्‍या यवतमाळकरांना किमान यापुढे तरी सर्व सुविधा नियमित मिळाव्यात, यासाठी सत्ताधार्‍यांसह सर्व लोकप्रतिनिधी व नेत्यांनी पुढाकार घ्यावा, एवढीच अपेक्षा.

विकासकामांसाठी एकत्र येण्याची गरज

यवतमाळ शहराचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा विकासाच्या मुद्दयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच केल्यास यवतमाळ शहराचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रिया गतीमान झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, त्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यक आता निर्माण झाली आहे. (garbage is being accumulated in yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT