apmc.jpg 
विदर्भ

हाताला नाही काम अन् सरकार म्हणते घरात थांब!

सुगत खाडे

अकोला : कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे सर्वांवरच बिकट परिस्थिती आली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. दिवसेंदिवस देशात आणि राज्यात लॉकडाउन वाढत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समित्यांसह उद्योग, व्यापार बंद असल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन आता पंतप्रधान मोदी यांनी वाढवून 3 मेपर्यंत केला आहे. त्यामुळे आधीच 21 दिवसांपासून टाळेबंदीचा फटका बसलेल्यांना आता पुन्हा 19 दिवस घरातच राहावे लागणार आहे. या टाळेबंदीचा सर्वात जास्त फटका हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाला बसला आहे. त्यामध्ये पूर्णतः हातवर पोट असलेल्या माथाडी कामगारांचा समावेश आहे. शहरात एक हजारावर माथाडी कामगार असल्याची माहिती आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समिती, सेंट्रल वेअर हाऊस, वखार महामंडळ, रेल्वे मालधक्का, गुड्स ट्रान्सपोर्ट सर्विस, किराणा व कोठडी बाजार, महाबिज, शासकीय धान्य गोदाम व इतर ठिकाणी नोंदणीकृत माथाडी कामगार काम करत असतात. परंतु त्यापैकी सर्वात जास्त कामगार कार्यरत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर ठिकाणी टाळेबंदीमुळे काम ठप्प आहे. त्याचा परिणाम संबंधित कामगारांच्या जीवनावर होत असून त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. टाळेबंदीमुळे कामगार गत् २१-२२ दिवसांपासून घरातच आहेत. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या हातांना १९ दिवस काम मिळणार नसल्याने त्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. 

कुटुंबाची गुजराण करणे देखील अवघड
लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये माथाडी कामगार हतबल झाले आहेत. हातावर पोट असल्यामुळे त्यांच्याजवळ हाताशी रोकड नाही. त्यातच टाळेबंदीमुळे हाताला काम नसल्याने कुटुंबाची गुजराण कशी करावी हा प्रश्न पडला आहे. या स्थितीत सरकारकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा या वर्गातून व्यक्त केली जात आहे.

अशी आहे कामगारांची स्थिती

  • कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४०० परवानाधारक माथाडी कामगार आहेत. संबंधितांना बाजार समितीने मदत दिली आहे. परंतु तितक्याच कामगारांनी परवाना नुतनिकरण केला नाही. त्यात महिला कामगार, हातगाडी वाले व इतरांचा समावेश आहे. त्यामुळे चारशेवर कामगारांच्या उरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
  • कोठडी बाजार, किराणा बाजारात माल वाहतूक होत नसल्याने या ठिकाणी कार्यरत माथाडी कामगारांच्या हाताला काम नाही. एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात सुद्धा मालाचा उठाव नसल्याने याठिकाणी कार्यरत कामगार घरीच आहेत. 
  • राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांची वाहतूक ठप्प असल्याने या ठिकाणी कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

शासनाने कामगारांना मदत द्यावी
टाळेबंदीमुळे कामगारांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक कामगारांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासकीय धान्य मिळत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक कामगाराला किमान दहा हजार रुपये सानुग्रह मदत द्यावी. यासंबंधी कामगार आयुक्तांकडे निवेदन देवून विविध मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने सुद्धा कामगार वर्गाची अडचण समजून त्यांना दिलासा द्यावा. 
- शेख हसन शेख मदन कादरी
संघटक, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT