छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

जाम प्रकल्प ओव्हरफ्लो, तरीही पाणी मिळेना़

मनोज खुटाटे : सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा, ता. 12 : पावसाने शेतकऱ्यांना जेरीस आणल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. यातून उभारी घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहे. यासाठी शेतकऱ्यांना कालव्यातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतीक्षा आहे. नरखेड तालुक्‍यातील जाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असतानाही सिंचनाकरिता पाणी मिळत नसल्याची शोकांतिका या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.


नरखेड तालुक्‍यात सिंचन प्रकल्पाचे काम गतिमान झाले नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील तीस वर्षांपासून काही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही. यात जाम व कार प्रकल्पाचा समावेश आहे. मागील वर्षी जाम प्रकल्प न भरल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांपासून मुकावे लागले होते. तर अनेकांच्या फळबागा ही वाळल्या होत्या. पण, यंदा तालुक्‍यातील कार व जाम हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. आता शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी पाण्याची गरज आहे. रब्बीच्या पेरणीसाठी पाण्याची गरज आहे. पण, कालव्यातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणारी शेतजमीन ही हलकी असल्यामुळे पाण्याची गरज असते. हरभरा व गव्हाची पेरणी करायची असले तरीही पाणी आवश्‍यक आहे. मात्र, कालव्यातून पाणीच येत नसेल तर पेरणी करावी तरी कशी असा सवाल केला जात आहे.


कालवे झाले झुडपात गुडूप
नरखेड तालुक्‍यात जाम व कार प्रकल्प यांचे कालवे झुडपात गुडूप झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांत कालव्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे या कालव्यातून सिंचनासाठी पाणी कसे येणार? हा खरा प्रश्न आहे. तसेच यातून पाणी सोडण्यात आले तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अपव्यय होण्याची शक्‍यतादेखील आहे. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी केव्हा पोहोचणार किंवा ते पोहोचेल की नाही? असादेखील प्रश्न आहे.

दोन तीन दिवस लागतील
रब्बी पिकांसाठी साधारण पाणी 15 नोव्हेंबरला सोडण्यात येते. पण, यंदा परतीचा पाऊस लांबल्याने आता 22 नोव्हेंबरला पाणी सोडू. कालव्याच्या सफाईचे काम सुरू आहे. पाणी सोडल्यानंतर साधारण दोन तीन दिवसात कालव्याच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल. आधी शेवटच्या टोकाला पाणी देण्यात येईल व नंतर मागे मागे येईल.
- प्रमोद गौरकर, शाखा अभियंता, जाम प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT