Shetkari jagar manch.jpeg 
विदर्भ

चलो दिल्ली!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : हम कागद नही दिखाएंगे!
तानाशाह आके जाएंगे, हम कागद नही दिखाएंगे!
तूम आसू गॅस उछालोंगे, तूम जहर की चाय उबालोंगे!
हम प्यार की शक्कर घोल के उसको गट गट गट पी जाएंगे,
हम कागज नही दिखाएंगे!
अशा भावना व्यक्त करीत, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंच, उद्यापासून ‘मुंबई ते दिल्ली’ ‘गांधी शांती यात्रा’ करीत असल्याचे, शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी मंगळवारी (ता.7) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची असताना, केंद्र सरकार त्यावर लक्ष देण्याऐवजी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायदा, यासारखे तत्सम विषय पुढे रेटत असल्याचा आरोप यावेळी शेतकरी जागर मंचने केला. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार आणि देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत घेऊन जाणार, अशा घोषणांसह केंद्र सरकार सत्तेत आले; परंतु या दोन्ही विषयांवर सरकार दिशाहीन दिसत असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे असताना, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या शेतमालाच्या भावाच्या तेजी मंदीचा आम्हाला कधी फायदा होईल? केंद्राचा दुष्काळ निधी कधी मिळेल? आमच्या तरण्याबांड मुलांच्या डोक्यात भावनेच्या कोलाहलाऐवजी भविष्याचे मार्ग शोधण्याचे विचार कधी येतील? हे प्रश्न घेऊन शेतकरी जागर मंचचे कार्यकर्ते यशवंत सिंन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांती यात्रा करीत असल्याचे, प्रशांत गावंडे यांनी सांगितले. यावेळी दिनकर देशमुख, विजय शर्मा, मो.एजाज, रवी पाटील अरबट, प्रमोद उमाळे, गजानन हरणे, राजू नाईक, डॉ.दत्ता देशमुख उपस्थित होते.

सिने कलाकार, ज्येष्ठ नेते, समाजसेवकांचा सहभाग
माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा याच्या नेतृत्वात काढल्या जाणाऱ्या या गांधी शांती यांत्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (महाराष्ट्र), माजी मुख्यमंत्री सुरेशभाई मेहता (गुजरात), शत्रुघ्न सिन्हा, अमोल पालेकर, कुमार केतकर यांचेसह देशभरातून अनेक मोठे सिने कलाकार, ज्‍येष्ठ राजकीय नेते, समाजसेवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे प्रशांत गावंडे यांनी यावेळी सांगितले.

गांधी शांती यात्रेचा मार्गक्रम
गांधी शांती यात्रेला 9 जानेवारीपासून प्रारंभ होत असून, मुंबई ते पुणे, पुणे ते नाशिक, नाशिक ते सुरत, सुरत ते बडोदा, बडोदा ते धंदुका, धंदुका ते पोरबंदर, पोरबंदर ते राजकोट, राजकोट ते अहमदाबाद, अहमदाबाद (निवास), अहमदाबाद ते उदयपूर आणि 20 जानेवारी 2020 रोजी उदयपूर ते अजमेर, असा मार्गक्रम राहणार आहे.

अकोल्यातून 50 कार्यकर्त्यांचा सहभाग
देशभरातून हजारो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार असून, अकोल्यामधून बुधवारी (ता.8) शेतकरी जागर मंचचे 50 कार्यकर्ते निघणार आहेत. शिवाय आयोजकांकडून कोणतेही निवेदन शासनाला सादर केले जाणार नसल्याचे प्रशांत गावंडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT