Chhagan-Bhujbal 
विदर्भ

Loksabha 2019 : पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से - छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से’ अशी घोषणा दिली. 

काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित जाहीर सभेत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, आमदार सुनील केदार, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार डॉ. आशीष देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अनीस अहमद, रमेश बंग, प्रफुल्ल गुडधे पाटील, ॲड. अभिजित वंजारी, अतुल लोंढे यांच्यासह नागपूरचे उमेदवार नाना पटोले, रामटेकचे किशोर गजभिये उपस्थित होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थितांना ‘अच्छे दिन’ आले काय? १५ लाख खात्यात आले काय? असा सवाल करीत त्यांनी पतंप्रधानांवर ताशेरे ओढले. एका दिवसात कष्टाने कमावलेल्या पैशाचे कागद करीत नोटाबंदी लादली. यातून १ कोटी व्यवसाय बुडाले. 

आजही हे व्यावसायिक उभे राहू शकले नाहीत. काळा पैसा जमा होईल, दहशतवाद संपुष्टात येईल, असे मोठी दावे केले गेले. परंतु दहशतवाद आणखी वाढल्याचे नमूद करीत भुजबळ यांनी नोटबांदी फसल्याचे सांगितले.

केंद्र सरकार केवळ विविध समुदायांत फूट पाडण्याचे काम करीत आहे. पानसरे, दाभोलकर प्रकरणातून उच्च न्यायालय जाब विचारत आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खरपूस समाचार घेतला. 
राफेल प्रकरण राहुल गांधी यांनी बाहेर काढले. या प्रकरणाची फाइलच गहाळ करण्यात आल्याचे ते म्हणाले. महागाई शिगेला पोहोचली असून काँग्रेसच्या काळात खिशात पैसे घेऊन खरेदीस गेल्यास गोणीभर सामान घरात येत होते. आता पुन्हा भाजप सरकार आल्यास गोणीभर पैशांमध्ये खिशातही सामान येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या सभेसाठी समन्वयक म्हणून आशिष दुआ यांनी जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT