विदर्भ

विधिमंडळातही गाजला होता बांगलादेशींचा मुद्दा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती बिल (सीएबी) वरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेत यावर चादळी चर्चा झाली. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही गाजला आहे. 

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त असल्याने केंद्र सरकारकडून एनआरसी लागू करण्यात आले. भारतीय नागरिक असल्याचे पुरावे द्यावे लागले. यावरून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोर मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. यासाठी नागरिकत्व दुरुस्ती बिल आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घुसखोर बांगलादेशींच्या मुद्याने राज्यातील राजकारणातही चांगलाच वादंग निर्माण झाला होता. 1998 पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. त्यावेळी सेना, भाजप युतीची सरकार होती. तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्री भाजपचे गोपीनाथ मुंडे होते. विधानसभेत नरसय्या अडाम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केवळ मुस्लिमांवर अशाप्रकारची कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

तत्कालीन विरोधी पक्षनेते मधुकर पिचड यांनीही मुद्दा उचलून धरला. त्या काळात राज्य सरकारने घुसखोर बांगलादेशींचा शोध घेऊन त्यांना मायदेशी सोडण्याची मोहीम सुरू होती. पश्‍चिम बंगालमध्ये या बांगलादेशींची सोडवून करण्यात आली होती. याचे पडसाद विधिमंडळात उमटले. मुंडे यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत फक्त घुसखोरांनाच परत पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री जोशी यांनी समर्थनात निवेदन केले होते. यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यापूर्वी 27 जुलै 1998 ला विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. येथेही चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. महाराष्ट्रातही अनेक बांगलादेशी व इतर देशातील मुस्लिम राहतात. त्यामुळे या अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT