file photo
file photo 
नागपूर

पूरग्रस्तांसाठी नागपूर विभागाला १६२ कोटी  

नीलेश डोये

नागपूर : पूरपरिस्थितीमुळे नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाकरिता १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. 

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाजांमधून ५ मीटरपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ साली ओढावलेल्या पुरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत, शेतांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांसोबत थेट संवाद साधला. 

या चारही जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांची पाहणी करताना वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला. 

नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांतील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी साहाय्य व मदत, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरिता, शेतपिकांच्या नुकसान, मृत जनावर व घराची अंशत: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसान, कारागीर, बाराबलुतेदार, दुकानदार व टपरीधारकांना मदत, जमिनीतील वाळू तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना साहाय्य, मोफत केरोसीन वाटपासाठी साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

जिल्ह्यांना मंजूर झालेला निधी 
नागपूर जिल्ह्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७९ हजार, भंडाऱ्याला ४२ कोटी ४३ लाख ५३ हजार, गोंदियाला १२ कोटी ३२ लाख ४० हजार, चंद्रपूरला ३७ कोटी ८१ लाख ६ हजार व गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ कोटी ३७ लाख २९ हजार रुपये तर वर्धा जिल्ह्याला ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

संपादन : मेघराज मेश्राम
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT