APMC Will be Closed On Tuesday 
नागपूर

वाचा.... आज काय बंद

राजेश रामपूरकर

नागपूर :  महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उद्या मंगळवारी (ता. २५) एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतरही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाजार शुल्क (मंडी सेस) वसूल करण्यात येत आहे. त्याविरुद्ध चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲण्ड ट्रेडने (कॅमिट) संपाचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले. 


राज्यात ३०७  कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) असून शेतकरी आणि बाजारादरम्यान एक साखळी म्हणून काम करते. बाजारात आलेल्या कृषी मालाच्या विक्रीवर सेस आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला कॅमेटचा विरोध आहे. बाहेर सेसची आकारणी त नाही पण एपीएमसीमध्ये सेसची आकारणी होत असल्याने संपूर्ण बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एकमताने एक दिवस महाराष्ट्रातील एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव रामअवतार तोतला यांनी समर्थन केले आहे. कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

दीपेन अग्रवाल म्हणाले की, एपीएमसीमधील निम्म्यापेक्षा अधिक व्यवहार बाहेर स्थलांतरित झालेले आहेत. त्यानंतरही एपीएमसीतर्फे सेसची आकारणी सुरू आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये सेस वसुली बंद केली आहे. परंतु, महाराष्ट्रात सुरूच आहे. त्याचा विरोध करण्यासाठीच २५ ऑगस्टला बंदचा निर्णय घेतला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT