Devendra Fadanvis saysThe DG sought deputation due to government intervention 
नागपूर

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारच्या कारभाराला वैतागुण सुबोधकुमार जयस्वालांनी मागितली प्रतिनियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सरकारच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले असावे की, सरकारच्या कारभाराला कंटाळून पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल प्रतिनियुक्तीवर जात आहे. महाराष्ट्रासाठी ही गोष्ट भूषणावह नक्कीच नाही. पोलिस विभागाच्या मनोबलावर या घटनेचा निश्‍चित परिणाम होणार आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ज्या प्रकारचा सरकारचा कारभार सुरू आहे. त्याला सुबोधकुमार जयस्वाल वैतागले होते. डीजींना कुठेही विश्‍वासात न घेता कामे सुरू आहे. राज्य सरकारने समजून घेतले पाहिजे की, पोलिसिंग हा स्वतंत्र विभाग आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विभाग येत असला तरी आपण त्या विभागाला स्वायत्तता दिली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे या विभागाच्या बाबतीतलं काम हे पर्यवेक्षकीय पद्धतीचे असते. परंतु, सद्यःस्थितीत छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून सर्वंच कामांमध्ये सरकारचा हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळेच डीजी सुबोधकुमार जयस्वाल यांनी असा निर्णय घेतला असावा.

शेवटी सरकारच्या इतर विभागाप्रमाणे हासुद्धा एक विभाग आहे. बदल होतच असतात, माणसं येत असतात आणि जात असतात. चांगली माणसं अशा प्रकारे घालवणे, हे योग्य नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारने धडा घेतला पाहिजे

महाराष्ट्राला सुबोधकुमार जयस्वाल, हे कार्यक्षम पोलिस महासंचालक लाभले होते. परंतु, पोलिसांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप येवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की, त्याला कंटाळून त्यांनी प्रतिनियुक्ती मागितली. केंद्र सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि त्यांना सीआयएसएफला प्रतिनियुक्ती दिली. यातून राज्य सरकारने धडा घेतला पाहिजे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT