Kisan Rail will run from Nagpur during the orange season 
नागपूर

संत्र्याच्या हंगामात नागपूरहून धावणार किसान रेल, काय सांगतात रेल्वेमंत्री

योगेश बरवड

नागपूर  ः संत्र्याचा हंगाम सुरू होताच देशातील विविध भागात संत्रा वाहतुकीसाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सुतोवाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले. गोयल यांनी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. यादरम्यान त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितार्थ किसान रेल्वे चालविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारदरम्यान पहिली किसान रेल्वे चालविण्यात आली. या सेवेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील विविध भागात संत्रा वाहतुकीसाठी नागपूरहून किसान रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हंगामानुसार फळे आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि कृषी मंत्रालय किसान रेल कोरिडॉरसाठी प्रयत्नशील आहे. 

नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी वातानुकूलित कोच सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. कृषी उत्पादनांचा अपव्यय हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गोदामे विकसित करण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेने पारित केलेल्या कृषी विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येईल. त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि जीवनमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या प्रयत्नामुळे शेतमाल विकण्यासंदर्भात अनेक दशकांपासून असलेल्या बंधनातून शेतकरी मुक्त झाले आहेत.

 त्यांच्या आणि देशाच्या कृषी क्षेत्राच्या जलद विकासाचे मार्ग खुले होणार आहेत असेही त्यांनी नमूद केले. दरांमध्ये होणाऱ्या विपरीत चढउतारांपासून संरक्षण देण्याचे काम नवीन कृषी विधेयके करतील, तसेच शेतकऱ्यांना आपल्याला हवे असलेले दराचे फायदे मिळवण्याचे स्वातंत्र्य असेल, असेही ते म्हणाले. 

संपादन  : अतुल मांगे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT