crime news
crime news e sakal
नागपूर

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून, आरोपीचीही आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून (nagpur crime news) करून आरोपीने केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. पाचपावली फाटकाजवळील चिमाबाई पेठ येथे ही घटना घडली. (man murder five people of same family in nagpur)

अलोक माथूरकर (४८)असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या आठ महिन्यापूर्वी अमरावतीवरून नागपुरात राहायला आला होता. चिमाबाई पेठ येथे भिसीकर यांच्या घरी किरायाने राहत होता. तो टेलरिंगचं काम करत होता. त्याच्याच घरी सासू लक्ष्मी बोबडे आणि मेव्हणी अमिषा बोबडे देखील राहत होत्या. मेव्हणी अमिषाचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने सासूला विचारणा केली. यावरून सासू आणि अलोकमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने मेव्हणीच्या बेडरुममध्ये जाऊन तिला मारले. त्यानंतर मुलगी परी (१४)आणि मुलगा साहिल (१२) या दोन्ही मुलांच्या जेवणात विष घातले. त्यामुळे मुलांचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर बायको विजया (४५)आणि सासू लक्ष्मीचा देखील खून केला. सर्वांना मारल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली.

दरम्यान, सकाळी उठल्यानंतर शेजाऱ्यांना कोणीही घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन बघितले असता सहा मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT