NCP
NCP NCP
नागपूर

विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी ‘मोठा भाऊ’ कसा होईल?

राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे बुधवारी (ता. १७) येणे निश्चित झाले आहे. तरी नागपूर जिल्ह्याचा संपर्क मंत्री अद्याप नेमण्यात न आल्याने आता आणखी कोणाची प्रतीक्षा केली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेला जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आघाडीच्या निर्मितीपूर्वी शरद पवार तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी अतिवृष्टी गावांची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांचे सारथ्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. आघाडीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीने विदर्भात विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल पटेल यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी बैठका आणि सभांचा धडाका लावला होता.

आपले खास समर्थक राजेंद्र जैन यांना नागपूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नेमले. मात्र, अल्पवधीतच राष्ट्रवादीचा उत्साह मावळला. मध्यंतरी कोरोनामुळेसुद्धा सर्व कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. ही सर्व गडबड सुरू असतानाच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याने राष्ट्रवादीचे नेतेही इतर नेत्यांनीही विदर्भाकडे फिरकणे कमी केले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत तर उमेदवारांना वाऱ्यावर सोडण्यात आले होते. या सर्व भानगडीत नागपूर जिल्ह्याचा संपर्क मंत्रीही राष्ट्रवादीने नेमला नाही.

संपर्क मंत्री केव्हा नेमणार

संपर्क मंत्री नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नियुक्त्या रखडल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा नियोजन समितीसह इतर शासकीय समित्यांवर आपले प्रतिनिधी नेमले. त्यांनी कामेही सुरू केली आहेत. महापालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाही वारंवार मागणी करूनही राष्ट्रवादीतर्फे संपर्क मंत्री नेमला जात नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल ९० कार्यकर्ते समित्यांपासून वंचित आहेत. विदर्भाकडे असेच दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी ‘मोठा भाऊ’ केव्हा होईल, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. या संदर्भात शरद पवार यांना निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT