Please Use Indian Made Rakhi
Please Use Indian Made Rakhi 
नागपूर

भारतीयांनो राख्या देशीच वापरा, कोण म्हणतेय असे..

राजेश रामपूरकर

नागपूर : रक्षाबंधनाला कुणीही चिनी राख्या वापरू नये, असे आवाहन अखिल भारतीय व्यापारी महासंघाने केले आहे. यंदापासून चिनी राख्यांवर बंदी घातल्यास त्या देशाचे चार हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा दावाही महासंघाने केला आहे. 


देशात रक्षाबंधनानिमित्ताने सहा हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. यापैकी केवळ चिनी राख्यांची बाजारपेठ चार हजार कोटींची आहे. शिवाय चीनमधून फोम, कागद, राखी धागा, मोती आणि राखीवरील सजावटीचे सामानही आयात होते. मात्र, यंदा भारत-चीनमधील तणावाच्या स्थितीमुळे ही आयात न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, वेगवेगळ्या राज्यांमधील आपल्या सभासदांना शहरांमधील स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या संस्था, महिला बचत गट, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने राख्या तयार करण्यास पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतही होईल. तसेच, पूर्णपणे भारतीय राखी बनवण्याचा हेतूही साध्य होईल, असे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी म्हटले आहे. "भारतीय सामान आमचा अभिमान' या मोहिमेअंतर्गत 10 जूनपासून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे भरतीया यांनी सांगितले. 

कॅटने स्वदेशी राख्यांसाठी स्वतःहून पुढाकार घेतला असून नागपूर, दिल्ली, भोपाळ, ग्वाल्हेर, भुवनेश्‍वर, कानपूर, सुरत, तीनसुकीया, कोल्हापूर, जम्मू येथे स्थानिक उत्पादक, कलाकारांच्या मदतीने राखी उत्पादन सुरू केले आहे. यासोबतच सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाच हजार राख्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना संघटनेतर्फे पाठविण्यात येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT