गोंदिया : आढावा बैठकीत बोलताना आमदार विनोद अग्रवाल. 
विदर्भ

या आमदाराने बॅंकांना सुनावले खडेबोल...पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा नको

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया (जि. गोंदिया) : जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. रोवणीपूर्व शेतीची कामे सुरू झाली आहेत. अशावेळी शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी राष्ट्रीय, खासगी, सहकारी तसेच विविध बॅंकांकडे अर्ज करीत आहेत. परंतु, पीककर्जासाठी अधिकाऱ्यांकडून आडमुठेपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार विनोद अग्रवाल यांनी पीककर्ज वाटपात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत बॅंक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

येथील पंचायत समिती कार्यालयात बुधवारी (ता. 24) पीककर्ज वाटपासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा

दरम्यान, किती रुपयांचे कर्ज वाटप केले, यापेक्षा किती शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला. किंबहुना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, पीककर्ज वाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कर्जाचे उद्दिष्ट 30 जूनपर्यंत पूर्ण करा

तालुक्‍यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 2 हजार 281 व व्यापारी बॅंकेचे 1 हजार 833 अशा एकूण 4 हजार 114 लाभार्थ्यांना खरीप पीककर्जाची गरज आहे. आतापर्यंत फक्त 322 शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच उर्वरित उद्दिष्ट 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यासंबंधी सूचनादेखील बॅंकांना केल्या. सोबतच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना बॅंकांना सुचविल्या.

कृषी पीककर्ज घेऊन उत्पादन वाढवा

दरम्यान, विविध राष्ट्रीय बॅंकांनीदेखील आपले टार्गेट वेळेत पूर्ण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पीककर्जाचा लाभ मिळवून देण्याचे व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेत कृषी पीककर्ज घेऊन कृषी उत्पादन वाढविण्याचे आवाहन आमदार अग्रवाल यांनी उपस्थित बॅंकांच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांना केले आहे.

ना हरकत प्रमाणपत्रासाठी बॅंकांत जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांना पीककर्ज घेतेवेळी आपण दुसऱ्या बॅंकेत थकबाकीदार नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित बॅंकेत कर्ज घेताना द्यावे लागते. मात्र नाहरकत प्रमाणपत्र मिळवताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. म्हणून शेतकऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हलफनामा द्यावा की त्यांच्याकडे कुठल्याही बॅंकेची कसल्याही प्रकारची थकबाकी नाही, असा हलफनामा दिलेल्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज भासणार नसल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Nitin Gadkari : RSS-BJP मध्ये मतभेद? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड का लांबतेय? नितीन गडकरी म्हणाले, 'तुम्ही चुकीच्या व्यक्तीला...'

Solapur News: 'मोहोळ तालुक्याला चार नद्यांच्या पुराचा वेढा'; सीनेने अनेक ठिकाणी पात्र बदलले; भीमा, भोगावती, नागझरीलाही पूर

Plastic Use and Brain Health Alert: दररोजच्या प्लास्टिकमुळे वाढतायत मेंदूविकार; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT