File photo
File photo 
विदर्भ

नागपूर विभागात 90 रुग्णांची नोंद; 14 व्हेंटिलेटरवर

सकाळवृत्तसेवा

नागपूर : दर दिवसाला स्क्रब टायफसने मृत्यू होत असून, गडचिरोली येथील 36 वर्षीय अमोल मंडल हा युवक दगावला आहे. 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तातडीने उपचार होत नसल्यानेच मृत्यू होत असल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये दाखल करण्यात येत असल्याने मृत्यूचा आकडा फुगत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अमोलच्या मृत्यूने आता मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. स्क्रब टायफसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळले. सध्या नागपूरच्या आरोग्य विभागात स्क्रब टायफसग्रस्तांची संख्या 90 झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात सध्या 50 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.
ओरियंटा सुतसुगामुशी नामक बॅक्‍टेरियाच्या संक्रमणामुळे होणाऱ्या या आजाराचे तातडीने निदान झाले, तर औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु, प्रशासनाने गंभीरतेने या आजारासंदर्भात दखल घेतली नाही. कागदोपत्री दखल घेतली. उपचारासाठी कोणतीही उपाययोजना तातडीने होत नसल्याची खंत रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेचे प्रशासन सुस्त
महापालिकेतर्फे स्क्रब टायफसच्या रुग्णांवरील उपचारासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. महापालिकेच्या एकाही रुग्णालयात स्क्रब टायफसची चाचणी होत नाही. साधी रॅपिड चाचणी होत नसल्यामुळे मेडिकलमध्ये रेफर करण्यात येत असल्याची तक्रार संजय गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाला महापालिकेच्या आरोग्य विभागाची तक्रार करण्यात येणार असल्याचे गायकवाड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT