छायाचित्र 
विदर्भ

गोंडेगाव कुंडबाबावासीयांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. जागेअभावी अनेक प्रकल्प रखडले आहेत. दुसरीकडे नागरिकांची मागणी असतानाही धरण तयार करण्यास टाळाटाळ होत आहे. नरखेड येथे धरण तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रशासन दरबारी खेटा घालत आहे. मात्र, अद्याप त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
नरखेड तालुका संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणूनही ओळखले जाते. या भागात पाण्याची कमतरता आहे. पाण्याअभावी येथील संत्रा बागा उद्‌ध्वस्त होताहेत. त्यामुळे येथे मोठे धरण तयार करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. गेल्या चार वर्षांपासून यासाठी येथील धरण कृती समितीने शासन दरबारी मागणी लावून धरली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही धरण तयार करण्याबाबतचे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धरणाबाबत आश्‍वासन दिले. धरणासाठी आवश्‍यक सर्वेक्षणासाठी 6 लाख 64 हजार 240 रुपयेही मंजूर केले. मात्र, अद्यापपर्यंत काम सुरू झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. येथील कसबा, गोंडेगाव, माणिकवाडा, भायवाडी, बेलोना, येरला, इंदोरा, गंगालडोह गावांतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : निवडणूक निकाल जवळ येताच शिंदे गट व भाजपाची धाकधूक वाढली; काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांची टीका

SCROLL FOR NEXT