विदर्भ

कीटकनाशक प्राशन करून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

कामठी - तालुक्‍यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कामठी तालुक्‍यातील अंबाडी येथे शुक्रवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव माणिक वानखेडे (२८, रा. अंबाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सुखदेव वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती असून शेतीवर तो वहिवाट करायचा. वडिलांच्या नावे या शेतीवर पंजाब नॅशनल बॅंकेच्या वडोदा शाखेतून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु शेती उत्पन्नात घट होत असल्याने कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्‍न गेल्या काही  दिवसांपासून उभा ठाकला होता. शेवटी याच विवंचनेतून त्याने शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधून कीटकनाशक प्राशन केले. तो बेशुध्दावस्थेत पडला असल्याचे पाहून त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेऊन त्याला लगेच नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठविला.

पत्नी गर्भवती
सुखदेव यांचे १६ एप्रिल २०१६ रोजी तालुक्‍यातील पडसाड येथील सोनू नामक मुलीशी लग्न झाले होते. पत्नी गर्भवती आहे. तर आईवडील वृद्ध असून वडील अपंग आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून या प्रकरणी कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT