file photo
file photo 
विदर्भ

नारायणगुडात असे काय घडले की युवकाच्या जिवावर बेतले...वाचा

सकाळ वृत्तसेवा

जिवती (जि. चंद्रपूर) : जिवती तालुक्‍यातील नारायणगुडा गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. गावातील हातपंप बंद असल्याने विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र, विहिरीतून पाणी काढणे एका युवकाच्या जिवावर बेतले आहे. पाणी काढताना पाय घसरून युवक विहिरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना तालुक्‍यातील कुंभेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नारायणगुडा येथे घडली. मारोती वैजनाथ कोसे (वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. पाण्यासाठी युवकाचा जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विहिरीतील पाण्यावर भागवीत होते तहान

जिवती तालुक्‍यातील अनेक गावांत उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गाव परिसरातील नाले, विहिरीतील पाण्यावर येथील नागरिक तहान भागवीत असतात. कुंभेझरी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या नारायणगुडा येथे हातपंप आहे.

हातपंप बंद असल्याने खड्ड्यातील पाण्याचा आसरा

गावातील नागरिक या हातपंपाच्या पाण्यावर तहान भागवीत होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून हातपंपाला पाणी येणेच बंद झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिक सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील खड्ड्यातील पाणी आणून तहान भागवीत असत. मात्र, त्या खड्ड्यातील पाणीसुद्धा आता आटले आहे.

पाणी काढत असताना पाय घसरला

त्यामुळे गावाजवळील एका विहिरीतून पाणी आणत होते. मारोती कोसे हा पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT